भारत हा विकसनशिल देश. विकासाच्या वाटेवर मोठ्या गतीनं देशाची घोडदौड सुरू आहे. अनेक क्षेत्रात विकासाच्या नव्या वाटा रूंदावत आहेत. त्यात भारतीय रेल्वेने नावलौकीक केले असून जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळं हे भारतातच आहे. भारतीय रेल्वे बरोबरच आता मेट्रो, लोकल्स आणि इतकंच नव्हे तर बुलेट ट्रेन येऊ घातली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळ विखुरलेलं आहे. मात्र, देशातलं ‘हे’ असं एकमात्र राज्य आहे जिथे फक्त एक रेल्वे स्टेशन असून लाखो लोकांच्या प्रवासाचे हे एकमेव साधन आहे. भारताच्या ‘या’ राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. वाचून बसलाना धक्का ? होय! पण हे खरं आहे, मग वाचा तर पूर्ण बातमी…

भारताचं यश की अपयश?

गेल्या १७० वर्षात रेल्वेची सेवा प्रचंड बदलली आहे. मेट्रोसारखे आधुनिक प्रकल्प भारतात यशस्वी झाले आहेत. अनेक महानगरांमध्ये लोकल्सचं जाळं तयार झालं आहे. आता भारतात नवीन बुलेट ट्रेन येऊ घातलीय. देशभरात रेल्वेनं आपलं जाळं विनलंय खरं मात्र, देशाच्या फक्त एका राज्याचा विसर पडला की काय? ‘या’ राज्यात अजूनही रेल्वे सेवा पोहोचू शकली नाही. ‘या’ राज्यासोबत असे रोज घडते, इथं एकच रेल्वे स्टेशन आहे आणि या स्टेशन नंतर रेल्वे लाईन संपते. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच स्टेशनवरून लोक कसे येतात आणि जातात? हे भारताचं यश आहे की अपयश? हाच मोठा प्रश्न पडलाय.

gahunje stadium ind vs eng t 20 match
Ind vs Eng : कोल्डप्लेसाठी स्वतंत्र ट्रेन, पण पुणेकरांना साधी बसही मिळेना; भारत वि. इंग्लंड सामन्यासाठी पोहोचण्याचा मनस्ताप अटळ!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
passengers struggled due to western railway mega block on Saturday
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी
Work on the 340 km subway, river bridges, and stations is progressing at full speed.
देशातील पहिल्या समुद्री भुयारी मार्गिकेतून इतक्या वेगात धावणार बुलेट ट्रेन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
Haldi Kunku Celebration At Mumbai Local
घरी, हॉलमध्ये नाही तर मुंबई लोकलमध्ये रंगला हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम; वाण देणेही चुकवले नाही; पाहा Viral Video

जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळं भारतात

IBEF.ORG च्या अहवालानुसार भारतात एकूण २२ हजार ५९३ रेल्वे धावतात. यामध्ये ९ हजार १४१ मालगाड्यांचा समावेश आहे, तर १३ हजार ४५२ रेल्वेमधून लोकं प्रवास करतात. दररोज जवळपास २४ दशलक्ष लोकं रेल्वेमधून प्रवास करतात.

(हे ही वाचा : घराच्या छतावरील पाण्याची टाकी गोलच का असते? अन् त्यावर रेषा का असतात? ‘हे’ आहे यामागचं खरं कारण )

‘या’ राज्यात आहे फक्त एकच रेल्वे स्टेशन

भारताच्या शेवटच्या टोकाला असलेले ‘मिझोराम’ हे एकमेव रेल्वे स्टेशन असलेले राज्य आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव ‘बैराबी रेल्वे’ स्थानक आहे. राज्यात दुसरे कोणतेही रेल्वे स्थानक नसल्याने प्रवाशांना ‘या’ एकाच रेल्वेने प्रवास करावा लागतो. साधारणपणे असे म्हटले जाते की, हे स्थानक देखील येथील शेवटचे रेल्वे स्थानक आहे, त्यानंतर रेल्वे मार्ग संपतो.

सर्वकाही एकाच स्टेशनवरून

‘मिझोराम’ राज्यात बैराबी रेल्वे स्थानक सामान्य पद्धतीने बांधण्यात आले असून, त्यात आधुनिक सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्थानकाचा कोड BHRB असून ते ३ प्लॅटफॉर्मचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी ४ ट्रॅकही आहेत. या छोट्या स्टेशनचे २०१६ मध्ये मोठ्या रेल्वे स्थानकात रूपांतरित करण्यासाठी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. यानंतर त्यावर अनेक सुविधाही वाढवण्यात आल्या. भविष्यात येथे दुसरे रेल्वे स्थानक बांधण्याचे, प्रस्तावही मांडण्यात आलं आहे.

Story img Loader