Indian Railway Rules: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं; त्यामुळेच भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. एका दिवसात लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हा भारतीयांच्या सर्वात जवळचा व आपुलकीचा विषय आहे. पण, या रेल्वेविषयी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या कदाचित आपल्यालाही माहिती नसतील. रेल्वेचे प्रवाशांसाठी अनेक नियम आहेत. पण, त्याविषयी प्रवाशांना फार कमी माहिती असते. रेल्वेतून रोजचा प्रवास करताना आपणाला रेल्वेचे प्रत्येक नियम माहिती असतात असे नाही. त्यातीलच एका नियमाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याविषयी तुम्हालाही माहिती नसेल.

देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग वाहतुकीची इतर साधने उपलब्ध असूनही रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी करतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी अनेक नियम केले आहेत. रेल्वेकडून ज्याप्रकारे सुविधा दिल्या जातात, त्याचप्रकारे प्रवाशांना प्रवास करण्यासंदर्भातही काही नियम दिले आहेत. प्रवाशांना रेल्वेच्या या नियमांचे पालन करूनच प्रवास करावा लागतो.

Ashwini vaishnaw pune nashik railway
जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक घेण्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आश्वासन, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
Anti-conversion law soon in Maharashtra and Bangladeshis Rohingyas will be sent back says Nitesh Rane
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा, बांगलादेशी, रोहिंग्याना परत पाठवू – नितेश राणे
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
st mahamandal upi ticket loksatta
ST Bus Tickets UPI : सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीचा यूपीआयचा तोडगा
Mumbai tuesday 28th january central railway harbour railway Trains delayed
मुंबई : रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, ८ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ, प्रवासात नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांची भर

(हे ही वाचा: रेल्वे तिकीट असतानाही प्रवाशाला टीटी रेल्वेतून उतरवणार, कारण काय? रेल्वेचा ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का? )

रेल्वे विभागातील एक प्रमुख पद म्हणून टीटीई पदाला ओळखले जाते. टीटीई म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एग्जामिनर (प्रवास तिकीट परीक्षक) टीटीईचे प्रमुख काम हे आहे की, रेल्वेमध्ये प्रवाशांची तिकिटे तपासणे. टीटीईचे काम तिकिटाशिवाय प्रवास करणार्‍या लोकांकडून दंड वसूल करणेदेखील आहे किंवा ते ट्रेनमधील रिकाम्या सीटबद्दलदेखील निर्णय घेऊ शकतात. पण टीटीई रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झोपलेल्या प्रवाशाला तिकीट तपासण्यासाठी उठवू शकतात का, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? काय सांगतो रेल्वेचा नियम जाणून घेऊया…

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, “रेल्वेमध्ये सध्या लागू असलेल्या नियमांनुसार, शक्यतो तिकीट तपासणी ही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजल्यापर्यंत करणे अपेक्षित आहे. परंतु ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री दहाच्या नंतर सुरू होतो किंवा गाडी रात्री दहाच्या नंतर सुरू होत असेल अथवा काही कारणांमुळे तिकीट तपासणी झालेली नसेल तर अशा प्रवाशांचे तिकीट हे रात्री १० नंतर देखील तपासले जाऊ शकते.”, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

त्याचप्रमाणे रेल्वेच्या नियमानुसार, रात्री प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या आवाजात संगीत ऐकण्यास आणि मोठ्याने बोलण्यास मनाई करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे

Story img Loader