भारताबाहेर प्रवास करायचा विचार आला की लगेच विमानाची तिकिटे बुक करण्याच्या शोधात आपण असतो. पण, विमानाच्या प्रवासाशिवाय तुम्ही रेल्वेनेही दुसऱ्या देशात प्रवास करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? भारतात अशी अनोखी रेल्वेस्थानके आहेत, जिथे तुम्ही बांगलादेश आणि नेपाळसारख्या शेजारील देशांमध्ये थेट प्रवास करू शकता. पेट्रापोल, हल्दीबारी, राधिकापूर, जयनगर, जागबानी आणि अटारी या सर्वांना प्रवासासाठी वैध पासपोर्ट आणि व्हिसाची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रापोल रेल्वेस्थानक

पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर स्थित, पेट्रापोल रेल्वेस्थानक एक प्रमुख ट्रान्झिट हब म्हणून काम करते. हे प्रवाशांना बांगलादेशातील खुलना येथे ब्रॉड-गेज मार्गाने जोडते. लक्षात ठेवा, येथे ट्रेनमध्ये चढण्यासाठी तुम्हाला वैध तिकीट, पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक असेल.

हेही वाचा… आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चेकचे नेमके प्रकार किती? जाणून घ्या

हल्दीबारी रेल्वेस्थानक

बांगलादेश सीमेपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर हल्दीबारी रेल्वेस्थानक असून तेथून बांगलादेशला थेट रेल्वे सेवा देते. या स्थानकावरून प्रवास करताना प्रवाशांनी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा सादर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे हे रेल्वेस्थानक आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक अत्यावश्यक स्टॉप आहे.

राधिकापूर रेल्वेस्थानक

दिनाजपूर, पश्चिम बंगाल येथे स्थित राधिकापूर रेल्वेस्थानक भारत आणि बांगलादेशदरम्यान एक रेल ट्रान्सिट पॉईंट म्हणून काम करते. हे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सोयीस्कर प्रवेश प्रदान करते, परंतु प्रवाशांनी त्यांच्याकडे आवश्यक प्रवासासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

हेही वाचा… Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या

जयनगर रेल्वेस्थानक

हे बिहारआधारित टर्मिनल स्थानक थेट नेपाळला जोडते, ज्यामुळे प्रवाशांना जनकपूरमधील कुर्था रेल्वेस्थानकापर्यंत ट्रेन पकडता येतात. अंदाजे ३९ गाड्या कार्यरत असून, नेपाळला पर्यटनासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुमचा पासपोर्ट आणि व्हिसा विसरू नका!

जोगबनी रेल्वेस्थानक

नेपाळचा आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे बिहारमधील जोगबानी रेल्वेस्थानक. हे स्थानक शेजारील देशाला थेट रेल्वे सेवा देते. प्रवास सुरळीतपणे सुरू करण्यासाठी प्रवाशांनी वैध पासपोर्ट आणि व्हिसा सोबत बाळगला पाहिजे.

हेही वाचा… कुठे गोलगप्पा तर कुठे गुप-चुप! तुमची आवडती पाणीपुरी आहे ‘या’ ८ नावांनी प्रसिद्ध

अटारी रेल्वेस्थानक

भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक महत्त्वपूर्ण जंक्शन, अटारी रेल्वेस्थानक हे पाकिस्तानला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेससाठी ओळखले जाते. जरी २०१९ पासून ही सेवा निलंबित केली गेली असली, तरी स्टेशनला अजूनही प्रवाशांना बोर्डिंग करण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा दाखवणे आवश्यक आहे.