श्रावण महिन्याला धार्मिक सण, उत्सव आणि व्रत यांचा महिना म्हणतात. या महिन्यापासून अनेक सणांना सुरुवात होते. यातील नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरात किनारपट्टीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते. नारळी पौर्णिमा हा सण फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा केली जाते. मासेमारी आणि समुद्राशी संबंधित इतर कामात गुंतलेल्या लोकांद्वारे, यात कोळी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, जे धुमधडाक्यात हा सण साजरा करतात.

महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या किनारपट्टी भागात प्रामुख्याने साजरा केला जाणारा हा सण मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करतो. मच्छीमार कोळी बांधव हंगाम सुरू होण्यापूर्वी या दिवशी जल आणि महासागराची देवता वरुणाची विशेष पूजा करतात. या दिवशी भगवान वरुणला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यावेळी वरुण देवाला अर्थात समुद्राला नारळ अर्पण करत कोळीबांधव समुद्रातून भरपूर मासे मिळावेत म्हणून विशेष प्रार्थना करतात. नारळ हे फळ शुभसूचक असून, ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले गेले आहे.

healthy liver: 1-3 of 10 Indians have liver disease, says health ministry; here’s how to ensure you’re safe
Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Police found gangster Somnath Gaikwad bought nine pistols from Madhya Pradesh to kill Vanraj Andekar
वनराज आंदेकरांच्या खूनापूर्वी दीड महिने आधी पिस्तूल खरेदी, मध्य प्रदेशातून पिस्तूले आणल्याचे उघड
Hungry Ghost festival
भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: दिल्लीचे चतुर!
elephant census
UPSC Key : यूपीएससी सूत्र : भारतातील हत्ती गणना होणारा विलंब अन् नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश, वाचा सविस्तर…
animal meet tirupati laddu marathi news
तिरुपतीमधील लाडू वाद चिघळला
Tirupati Laddu Revenue in Marathi
Tirupati Laddu Revenue: जनावरांच्या चरबीचा प्रसादात वापर; लाडू विकून तिरुपती मंदिराला किती महसूल मिळतो?

पूजेचा विधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार आपल्या सजवलेल्या बोटी समुद्रात घेऊन जातात आणि शुभकार्य सुरू केल्यानंतर ते काही वेळातच समुद्रातून किनाऱ्यावर परततात आणि कुटुंबासह आनंद साजरा करतात.

नारळी पौर्णिमेला पूजा करणाऱ्या भाविकांचा असा विश्वास आहे की, समुद्राची पूजा केल्याने वरुण देव प्रसन्न होतात आणि समुद्राच्या सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण करतात. या दिवशी भगवान शिवाचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की, नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शिवाचे प्रतीक आहेत आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे. या दिवशी भगवान शिवाला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.

या सणानिमित्ताने कोळी बांधव बोटींना रंगरंगोटी करून सजवतात.  बोटींना पताका लावतात.  या उत्सवादरम्यान नारळांना विशेष महत्त्व आहे, मच्छीमार देवांना फळांचा प्रसाद देतात, ज्याचा वापर नंतर गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या दरम्यान फळे, सुका मेवा आणि काही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. मात्र, उपवासाच्या वेळी नारळापासून बनवलेल्या पदार्थांना सर्वाधिक पसंती मिळते. निसर्गाप्रती आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी या दिवशी झाडे लावली जातात. कोळी बांधव या सणानिमित्त आपल्या गावठाणात गायन आणि नृत्य जत्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात.