One Day Capital of India: सध्या दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी म्हणून ओळखली जाते. पण इतिहासाची जुनी पाने उलटली तर कळेल की दिल्ली ही नेहमीच राजधानी राहिली नाही. इतिहासाची पानं उलटली तर लक्षात येतं की, मागच्या काळात देशाच्या वेगवेगळ्या राजधान्या झाल्या. अनेक राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात राजधानीचे अस्तित्वच बदलून टाकले. पण तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहीत नसेल की, भारतात इंग्रजांच्या राजवटीत एकदा एका शहराला एका दिवसासाठी देशाची राजधानी बनवण्यात आली होती. त्या शहराचे नाव काय होते माहित आहे का? नसेल तर हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला त्या शहराचे नाव सांगणार आहोत.

केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले ‘हे’ शहर

ब्रिटीशांच्या काळात भारतातील एक शहर हे एका दिवसासाठी देशाची राजधानी बनले होते. हे शहर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सध्या आपण सर्व या शहराला प्रयागराज या नावाने ओळखतो. पण ज्या वेळी हे शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते, त्या काळात हे शहर अलाहाबाद म्हणून ओळखले जात होते. १८५८ मध्ये ब्रिटीश राजवटीत यूपीचे तत्कालीन अलाहाबाद हे एका दिवसासाठी आपल्या देशाची राजधानी बनले होते.

Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
venus mission isro
काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट
third largest economy India marathi news
भारत २०३१ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था
Trade Connect, trade, Online Forum,
व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच
PM Narendra Modi, Wardha,
पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार
expert committee change in policy for determining height of statues
पुतळ्यांची उंची ठरविण्यासाठी धोरणात बदल; तज्ज्ञ समितीची शिफारस, लवकरच १५ दिवसांत घोषणेची शक्यता

(हे ही वाचा : आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या ‘Police’ या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? जाणून थक्क व्हाल )

एका दिवसासाठी भारताची राजधानी बनण्याचे कारण काय?

आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की असे का? वास्तविक या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा कारभार ब्रिटीश राजेशाहीकडे सोपविला असे म्हटले जाते. त्या काळातील अलाहाबाद ही उत्तर-पश्चिम प्रांतांचीही राजधानी होती. त्यावेळी अलाहाबाद हे ब्रिटीश सैन्याचे तळ असायचे, तिथे त्यांनी खूप काम केले. दिल्लीपूर्वी देशाची राजधानी कलकत्ता असायची. जे १९११ मध्ये इंग्रजांनी दिल्लीत हलवले होते.