आपण बऱ्याचदा पाण्याची बाटली विकत घेऊन ते पाणी पितो. १० ते ३०० रुपयांपर्यंतच्या किंमतीत अर्धा ते एक लीटर पाण्याच्या बाटलीची विक्री होते. शुद्ध पाणी मिळावं यासाठी लोक पाणपोईवर, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधलं पाणी न पिता पाण्याच्या बाटलीवर पैसे खर्च करतात. तसेच आपल्या घरात येणारं पाणी शुद्ध असतं का? हा चर्चेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे अनेकजण घरी पाणी शुद्ध करण्याची मशीन जोडून घेतात. अथवा घरी २५ ते ३० लीटरच्या पाण्याच्या मोठ्या बाटल्या मागवतात. अशीच परिस्थिती आपल्या कार्यालयांचीसुद्धा आहे. तिथेही २५ ते ३० लीटरच्या पाण्याच्या मोठ्या बाटल्या मागवल्या जातात. कारण, नदी असो अथवा तलाव किंवा विहिरीतल्या पाण्याची शुद्धतेची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. भारतामध्ये नदी प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळेच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना राबवाव्या लागत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा