भारताच्या प्रशासकीय नकाशात सामान्यत: एकाच राज्यातील जिल्हे दर्शविले जातात, ज्यामुळे सुव्यवस्थित प्रशासन सुनिश्चित होते. पण, असा एक जिल्हा आहे जो दोन राज्यांमध्ये विभागला गेला आहे, जो भारताच्या प्रशासकीय रचनेत एक दुर्मिळ आणि आकर्षक उदाहरण ठरतो. हा जिल्हा आहे चित्रकूट. चित्रकूटचा अर्थ ‘अनेक आश्चर्यांची टेकडी’ असा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विभागलेला आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या जिल्ह्याचे विभाजन कसे केले जाते? (How is the district divided?)

चित्रकूटचे वेगळेपण त्याच्या भौगोलिक आणि प्रशासकीय रचनेत आहे. चित्रकूट जिल्ह्यातील चार तहसील – कारवी, राजापूर, माऊ आणि मानकपूर हे उत्तर प्रदेशात आहेत; तर जिल्ह्याचा एक महत्त्वाचा भाग असलेला चित्रकूट नगर हे मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात आहे. या विभाजनामुळे येथे मनोरंजक परिस्थिती निर्माण होते. या एकाच जिल्ह्यातील रहिवाशांवर दोन वेगवेगळ्या राज्य प्रशासनांचे नियंत्रण असते. प्रत्येक राज्य प्रशानासनाचे स्वत:चे कायदे, धोरणे आणि शासन पद्धती असते. पण, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे असल्याने येथे प्रशासन करणे थोडे सोपे आहे, त्यामुळे दोन राज्यांमध्ये कोणताही संघर्ष होत नाही.

हेही वाचा –Mahakumbh Mela 2025 : संस्कृती अन् नद्यांची संगम भूमी असलेल्या ‘प्रयागराज’च्या नावाचा अर्थ माहीत आहे का?

दोन राज्यांमध्ये विभागले का आहे? (Why is it divided into two states?)

चित्रकूट हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेल्या उत्तर विंध्य पर्वतरांगांमध्ये असल्याने त्याचे स्थान अद्वितीय आहे. चित्रकूटचा बहुतांश भाग उत्तर प्रदेशात आहे, तर त्याचा काही भाग मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात येतो. जिल्ह्याच्या सरकारी वेबसाइटनुसार, उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्याची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली.

हेही वाचा – रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते का? काय आहेत रेल्वेचे नियम?

हिंदू धर्मात चित्रकूट पर्वताचे महत्त्व?

रामायणानुसार, भगवान रामाने सीता आणि लक्ष्मणाबरोबर चौदा वर्षांच्या वनवासातील साडेअकरा वर्षे येथे घालवली असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान रामाने त्यांच्या वडि‍लांसाठी श्राद्ध समारंभ केला तेव्हा सर्व देवी-देवता शुद्धी मेजवानीत सहभागी झाले होते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या निधनानंतर तेराव्या दिवशी पारंपरिकपणे आयोजित केलेल्या या विधीमुळे चित्रकूटच्या पवित्र भूमीवर एक दिव्य उपस्थिती निर्माण झाली होती असे मानले जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is the only district in india divided between two states the residents of the same district are controlled by the administration of both the states snk