मागच्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता, आज तो थंडावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा देत जोरदार प्रचार केला होता. आतापर्यंत त्यांनी २०६ सभा आणि रोड शो घेतले आहेत. तर ८० हून अधिक मुलाखती दिल्या आहेत. टाइम्स नाऊ संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. प्रचंड प्रचारानंतर आता पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमधील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचले आहेत. तिथे दोन दिवस ते ध्यानधारणा करणार आहेत. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती.

माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार आज सायंकाळाचा सुर्योदय पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी ध्यानासाठी बसतील. १ जून रोजी दुपारी ३.३० वाजता ते कन्याकुमारीहून माघारी निघणार आहेत. मोदी येणार असल्यामुळे रॉक मेमोरियल परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पर्यटकांना याठिकाणी बंदी घालण्यात आली असून पुढचे दोन दिवस तब्बल २००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Nitin Gadkari Inauguration ceremony of development works held at Karvenagar Attendance of BJP workers is low
गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
pm Narendra modi birthday
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज ७५ व्या वर्षात पदार्पण; वाढदिवस कसा साजरा करणार?
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
it is not good for person holding post of Prime Minister visiting house of Chief Justice of country on occasion of Ganapati Puja
गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’
hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले

२०१९ सालीही लोकसभेचा प्रचार संपल्यानंतर अशाचप्रकारे पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. यावेळी १९ एप्रिल रोजी सुरू झालेला लोकसभेचा महासंग्राम १ जून संपत आहे. तर ४ जून रोजी मतदानाचा निकाल लागेल.

पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये अधिक लक्ष दिले होते. यावेळी भाजपाला सर्वाधिक यश पश्चिम बंगालमधून मिळेल, असे ते म्हणाले. तृणमूलच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. ४ जून रोजी बंगालमध्ये एकतर्फी निकाल दिसेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या जागा ३ वरून थेट ७७ पर्यंत वाढल्या होत्या. तर २०१४ साली पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या केवळ दोन जागा होत्या, तर २०१९ मध्ये भाजपाने तब्बल १८ जागा जिंकून मोठे यश प्राप्त केले होते. मतदानाच्या टक्क्यातही भाजपाने चांगलीच प्रगती केली. एकाबाजुला तृणमूल काँग्रेसला ४३ टक्के मतदान मिळाले असताना भाजपानेही ४० टक्क्यांपर्यंत मतदान मिळवले.