राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अशातच एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस नेते, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“राहुल गांधी आणि अशोक गेहलोतांचा मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला हिरो मानतो. तोच मतदार मोदींना लोकसभेत भाजपाला मतदान करतो. मग, आम्ही निवडणूक लढवली, तर मते विभागण्यासाठी आला, असा आरोप करण्यात येतो,” अशा शब्दांत ओवैसींनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.

Bahujan Vikas Aghadi leader Prashant Raut beaten
बहुजन विकास आघाडीचे नेते प्रशांत राऊत यांना मारहाण
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
PM Narendra Modi Mocks Rahul Gandhi
नरेंद्र मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, “काँग्रेसकडून पडलेल्या लहान पोराचं मन रमवण्याचा प्रकार..”
Abused in Legislative Council over Rahul Gandhi statement
राहुल गांधींच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत शिवीगाळ
rahul gandhi
दिल्लीत ‘अटीतटीचं’ राजकारण! “लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा देऊ पण…”; राहुल गांधींचं वक्तव्य
udhav thackery criticized raj thackeray
“…म्हणून काही जणांनी मोदींना ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला!
wash feet, reaction, Vijay Gurav,
एक काय, दहावेळा पाय धुणार! विजय गुरव यांची सडेतोड भूमिका, म्हणाले, “पटोले माझे दैवत, विरोधकांनी राजकारण…”
satara lok sabha marathi news
अजित पवारांनी आयत्यावेळी शब्द फिरवल्याने साताऱ्यात नाराजी

हेही वाचा : मध्य प्रदेश-राजस्थान-छत्तीसगढमध्ये स्थानिक नेतृत्व भाजपच्या यशातील अडचण?

जयपूर येथे प्रचारसभेत बोलताना ओवैसी म्हणाले, “नरेंद्र मोदींचा पराभव करणं, हे तुमचं ध्येय आहे. तर, मोदींना पंतप्रधान होऊ न देणं, हे माझंही ध्येय आहे. ‘तुम्ही भाजपाला मतदान केलं का?’ हे विचारलं, तर नाही म्हणाल. ‘जयपूर मतदारसंघातून २०१९ साली मोदींना मतदान केलं का’ या प्रश्नावरही तुम्ही नाही म्हणून सांगाल.”

“मग, २०१९ साली जयपूरमध्ये भाजपाला विजय कसा काय मिळाला? याचं उत्तर मी शोधलं. राहुल गांधी आणि अशोक गेहलोतांचा मतदार मोदींना आपला हिरो मानतो. तोच मतदार भाजपाला मतदान करतो. मग, आम्ही निवडणूक लढवली, तर औवेसी मते विभागण्यासाठी आला, असा आरोप आमच्यावर केला जातो,” असं ओवैसींनी सांगितलं.

हेही वाचा : दक्षिण राजस्थानमध्ये आदिवासींची मते काँग्रेस-भाजपसाठी निर्णायक ठरणार का ?

“आम्ही पहिल्यांदाच राजस्थानमध्ये निवडणूक लढत आहोत. याआधी भाजपा कुणामुळे जिंकली? भाजपाचे सर्व खासदार निवडून कसे काय आले? याचं उत्तर काँग्रेसवाले देऊ शकत नाही,” अशी टीका ओवैसींनी केली आहे.