१९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यापासून ते आतापर्यंतच्या शरद पवारांच्या राजकीय खेळींवर अजित पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही करतो ती गद्दारी कशी काय? असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापुढे उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आहे. या गटाला निवडणूक आयोगाने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यतादेखील दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष चालू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. आज (२ मे) पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. तसेच शरद पवार यांनी गेल्या पाच दशकांमध्ये केलेल्या राजकीय खेळींवरून त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित कले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा