छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीला पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारला आहे. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून निसटली आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“हा निकाल अनपेक्षित लागला नाही. मी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हा अमित शाहांनी ‘निकाल चांगला लागेल,’ असं सांगितलं होतं. पण, काहीवेळा नको तेवढा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय,” असा टोला अजित पवारांनी काँग्रेसला लगावला आहे.

jawans killed seven Naxalites during encounter in Chhattisgarhs Dantewada
गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
50 companies migrated from Chakan MIDC to different states says jayram ramesh
चाकण एमआयडीसीतून ५० कंपन्या परराज्यांत स्थलांतरित! काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; उद्योग संघटनेकडून दुजोरा
Raj Thackeray meets child in Train
Raj Thackeray : राज ठाकरेंना ट्रेनमध्ये पाहून चिमुकला म्हणाला, “जय महाराष्ट्र”, त्यानंतर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!
satyapal malik
राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल- सत्यपाल मलिक
UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना हरियाणा, जम्मू-काश्मीरच्या प्रचारापासून भाजपाने दूर का ठेवले?
Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल

“के. चंद्रशेखर राव यांनी खूप जाहिरातबाजी केली”

“नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये नागरिकांनी कौल दिला आहे. तेलंगणात रेवंथ रेड्डी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. पण, काही कारणास्तव ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे तेलंगणातील चित्र बदलेले दिसत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी खूप जाहिरातबाजी केली. पण, लोकांनी त्यांना नाकारलं,” असंही अजित पवारांनी म्हटलं.

“तेलंगणात वेगळा निकाल कसा काय लागला?”

“आता इंडिया आघाडीतील नेते ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याचं बोलायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको. मग, तेलंगणात वेगळा निकाल कसा काय लागला? जनतेनं मोदी सरकारला पाठिंबा आहे. पंजाबात आपचं सरकार आलं. दिल्लीतही दुसऱ्यांदा आप निवडून आली. त्यांनीही ईव्हीएमध्ये घोटाळा केला का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

“…तर चव्हाण प्रतिष्ठानला येऊन द्यायचं नव्हते”

“मी कर्जतमधील शिबिरात बोललो त्या गोष्टीत त्रिवार सत्य आहे. मी २ जुलैला शपथ घेतली. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातच आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. आमच्याबद्दल राग होता, तर चव्हाण प्रतिष्ठानला येऊन द्यायचं नव्हते. पुण्यात उद्योगपतीच्या घरीही मी गेलो होतो. आज एक आणि उद्या एक बोलायचं तो माझा स्वभाव नाही,” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिलं आहे.