काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्र अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मतदानाच्या काळात १५० जिल्हा अधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केले होते, असा दावा जयराम रमेश यांनी केला होता. या दाव्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी घेतली असून जयराम रमेश यांच्यावर दाव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जयराम रमेश यांचा दावा काय ?
गृहमंत्री अमित शाह जिल्ह्याधिकाऱ्यांना फोन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १५० अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. अधिकाऱ्यांना खुलेआमपणे धमकावण्याचा प्रयत्न लाजिरवाणं आहे. जनादेशातून लोकशाही चालते, धमकावण्याने नाही. ४ जूनला मिळणाऱ्या जनादेशातून अमित शाह, नरेंद्र मोदी आणि भाजपा सत्तेतून बाहेर असतील आणि इंडिया जनबंधन विजयी ठरेल. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, असं जयराम रमेश म्हणाले होते.
The outgoing Home Minister has been calling up DMs/Collectors. So far he has spoken to 150 of them. This is blatant and brazen intimidation, showing how desperate the BJP is. Let it be very clear: the will of the people shall prevail, and on June 4th, Mr. Modi, Mr. Shah, and the…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 1, 2024
निवडणूक आयोगाचे आयुक्त काय म्हणाले?
“वातावरण तयार केलं गेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो? संपूर्ण देशातील ५००-८०० अधिकाऱ्यावंर दबाव टाकला जाऊ शकेल काय? कोणी दबाव टाकला असेल तर त्यांचं नाव सांगा. आम्ही त्यांना शिक्षा करू. मतमोजणीच्या आधीच त्यांचं नाव सांगा. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काही मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. आम्ही प्रत्येक रिटर्निंग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आदेश दिले आहेत”, असं राजीव कुमार म्हणाले. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.
#WATCH | On Congress leader Jairam Ramesh's allegations that Union HM called DMs/ROs (Returning Officers), CEC Rajiv Kumar says, "…Can someone influence them (DMs/ROs) all? Tell us who did this. We will punish the person who did it…It is not right that you spread a rumour and… pic.twitter.com/iejNzcZQ2G
— ANI (@ANI) June 3, 2024
देशात यंदा सर्वाधिक मतदान
निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. G7 मधील एकूण देशातील दीडपट अधिक तर, युरोपिअन युनिअनमधील २७ देशाच्या तुलनेत अडीचपट अधिक हे मतदान आहे. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल ३१ कोटी १४ लाख महिला मतदार आहेत.
हेही वाचा>> लोकसभेच्या निमित्ताने देशात घडला विश्वविक्रम, ‘इतक्या’ कोटी मतदारांनी केलं मतदान
‘लापता जेंटलमन’ला प्रत्युत्तर
मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लापता जेंटलमन म्हणत डिवचलं गेलं होतं. या टीकेवरही त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कधीच बाहेर गेलो नव्हतो.प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत होतो. मतदानाच्या काळात आम्ही जवळपास १०० प्रसिद्धी पत्रके काढली, असं राजीव कुमार म्हणाले.