आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांना त्यांची बहीण वाय.एस.शर्मिला यांनी आव्हान दिले आहे. जगनमोहन हे वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. तर शर्मिला या आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा असून, राज्यातील कडपा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहेत. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देशम तसेच अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि भाजप यांनी आव्हान दिलेय. त्याचबरोबर शर्मिला या राज्यात काँग्रेसचा जोरदार प्रचार करत आहेत.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

* जगनमोहन राज्यभर प्रचार करत असून, सत्ताविरोधी लाटेचा त्यांना सामना करावा लागतोय.

हेही वाचा >>> पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

* शर्मिला यांनी निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात त्यांनी १३२ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मात्र यात भाऊ जगनमोहन व वहिनी भारती यांच्याकडून ८३ कोटींचे कर्ज दाखवले आहे.

* वडील वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचा वारसा सांगण्याचा दोघांचाही प्रयत्न दिसतो. वाय.एस.आर.तेलंगण पक्ष स्थापन करून शर्मिला यांनी तेथील राजकारणात लक्ष घातले. मात्र त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. आता काँग्रेसने त्यांच्याकडे आंध्र प्रदेशची धुरा सोपवली. त्यामुळे या भावंडांमधील राजकीय संघर्ष वाढला. * आंध्रच्या विभाजनानंतर म्हणजेच २०१४ नंतर राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट आहे. त्यामुळे शर्मिला या पक्षाला यश मिळवून देतील अशी त्या पक्षाच्या नेत्यांना आशा आहे. वायएसआर काँग्रेस शर्मिला यांच्यावर थेट टीका करत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Story img Loader