Rais Shaikh News : विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. काही वेळातच प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. कोण विजयाची हॅट्ट्रिक करणार तर कुणाला हार मानावी लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आतापर्यंत महायुती २३५ जागांनी आघाडीवर आहे. सकाळपासून आलेल्या आकडेवारीवरून महायुतीने एकहाती विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याचं दिसत आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात जनतेचा कौल शिवसेना आणि मनसेच्या उमेदावाराला न मिळता थेट समाजवादी पार्टीला मिळाल्याचं दिसतंय.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भिवंडी पूर्वमध्ये सपाचे उमेदवार रईस शेख यांना १,१९,६८७ मते मिळाली आहेत, तर शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना ६७,६७२ मते मिळाली आहेत. यावरुन रईस शेख ५२,०१५ मतांनी आघाडीवर तर इतक्याच मतांनी संतोष शेट्टी पिछाडीवर आहेत “भिवंडीची जनता महाराष्ट्रातील सर्वाधिक सुज्ञ मतदार आहे”, असं म्हणत रईस शेख यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”

हेही वाचा : Rajapur Assembly Election Results 2024 : राजापुरात किरण सामंत यांचा विजय ; ठाकरे गटाचे राजन साळवी पराभूत

सपाचा ऐतिहासिक विजय


माध्यमांशी संवाद साधताना रईस शेख यांनी म्हटलं की, “तुम्ही वाईटाच्या विरुद्ध उभे असाल आणि खऱ्याची साथ देत असाल, तसेच तुम्ही संविधानाबद्दल बोलत असाल तर भिवंडीची जनता तुमच्याबरोबर उभी राहते. हिंदू-मुस्लीम अशा राजकारणात न पडता भिवंडीच्या जनतेने समाजवादी पार्टीला, लाल टोपीला साथ दिली आहे. तुम्ही स्वत: खरे असाल तर तुमचा विजय नक्की होतो. सपाचा हा एक ऐतिहासिक विजय आहे. भिवंडी शहरातील नागरिक नेहमीच चांगल्या विचारधारेच्या पाठीशी उभे असतात.”

जात-धर्म, पैसे यांवर होणारे राजकारण पूर्णतः संपले

“भिवंडीत आजपासून जात-धर्म, पैसे यांवर होणारे राजकारण पूर्णतः संपले आहे. मला असे वाटले होते की, तीस ते पस्तीस हजारांचा फरक असेल. मात्र, भिवंडीच्या जनतेने भरभरून प्रेम केले आणि सध्या बावन्न हजारांहून जास्त जागांवर सपा आघाडीवर आहे”, असं रईस शेख म्हणाले.

मविआच्या निकालाचं दु:ख आहे…

महाविकास आघाडीत आमचे अनेक साथी मागे आहेत, त्यामुळे मला दु:ख होत आहे. माझ्या विजयाचा मला आनंद आहे, मात्र मविआच्या निकालाचं दु:ख आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आमची विचारधारा पोहोचवणार आहोत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पैसे, जात-धर्म, ताकद, भीती यावरुन होणारं राजकारण पूर्णत: संपवणार आहोत”, असंही यावेळी रईस शेख यांनी म्हटलं.

हेही वाचा : Swara Bhaskar : पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करचा संताप; म्हणाली, “९९ टक्के चार्ज EVM उघडल्या अन्…”

तसेच जनतेचे आभार मानत रईस शेख यांनी पुढे म्हटलं की, “भिवंडीची जनता महाराष्ट्रातील सर्वाधिक समजदार जनता आहे. येथील नागरिकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगले रस्ते, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी मतदान केलं आहे आणि आम्हाला मदत केली आहे. भिवंडीच्या जनतेने संपूर्ण महाराष्ट्राला मोलाचा संदेश दिला आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या फक्त विकासाच्या मुद्दयावर होणार आहेत.”

Story img Loader