लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचा मेळावा ठाणे लोकसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘मी जेव्हा ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो’, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिला. याच मेळाव्यात बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोठ्या मनाचे माणूस आहेत. त्यांच्या पोटात एक आणि मनात एक असे नाही. ते कोत्या मनाचे नाही तर मोठ्या मनाचे आहेत, असे भाष्य केले.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“महायुतीचे सरकार सर्वसामान्य माणसांचे सरकार आहे. आपले सरकार सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करते. आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. ज्यावेळी मी दावोसच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा अनेक देशाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारले होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही राज्याचे सरकार चालवतो. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी १ लाख ३७ हजार कोटींच्या उद्योग आले होते. त्यातील काम ८० टक्के झाले. त्यानंतर दुसऱ्यावेळी ३ लाख ७३ कोटींचे करार झाले आहे. त्यामुळे आपले राज्य उद्योगस्नेही झाले आहे”, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
sambhaji brigade workers staged a strong protest in front of sculptor jaideep apte house in kalyan
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
Sharad Pawar-Sunita Kejriwal meeting in Pune
शरद पवार-सुनीता केजरीवाल यांची पुण्यात भेट
CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi Ladki Bahini Yojana
Eknath Shinde : “…तर गाठ माझ्याशी आहे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

हेही वाचा : काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर; वरिष्ठांच्या भेटीनंतर घेतला ‘हा’ निर्णय

“गडचिरोली हा भाग नक्षलवादी भाग आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. ज्यावेळी मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. तेव्हा सुरजागडचा एक प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी खूप अडचणी आल्या. मुख्यमंत्र्‍यांनीही मला सपोर्ट केला नाही. त्यावेळी डीजी आणि पोलिसांनीही सपोर्ट केला नाही. ते म्हणाले की, हल्ला होईल, नारगरिक मारले जातील. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते, नक्षल मोठा की सरकार मोठे? जर तुम्हाला प्रकल्प करायचा नसेल तर मी स्वत: तेथे जाऊन प्रकल्प सुरु करेल. त्यानंतर मी तेथे जाऊन प्रकल्प सुरु केला. आज १० हजार लोक त्या ठिकाणी काम करत आहेत”, असे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

“गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात आपण काम करु शकलो. कारण हे राज्याचे काम आहे. तेथील नक्षलवाद कमी झाला. काही नक्षलवादी मध्य प्रदेशमध्ये गेले. त्यावेळी काँग्रेसचे सरकार असताना ते त्यांना आश्रय देण्याचे काम करत होते. मात्र, आता मध्य प्रदेशमध्येही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे ते नक्षलवाद्यांना ठोकून टाकतील”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, “माझ्याआधी नरेश म्हस्के यांनी सांगितले की, मी फार प्रेमळ आहे. मी प्रेमळ आहेच. मात्र, ज्यावेळी ठरवतो त्यावेळी करेक्ट कार्यक्रम करतो. दोन वर्षापूर्वी आपण करेक्ट कार्यक्रम केला. आता फक्त विकास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे”, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.