लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह राहुल गांधीवर हल्लाबोल केला. तसेच विखे पाटील यांची मुळं इतकी खोलवर आहेत की महाविकास आघाडीचे कुणीही आले तरी ते उखडू शकत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी आघाडीवर केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमली म्हणजे सुजय विखेंचा विजय पक्का आहे. खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचे वटवृक्ष केलं. आता ही परंपरा सुजय विखे पुढे चालवत आहेत. सुजय विखे हे या मतदारसंघातील प्रश्न ते संसदेत मांडतात. त्यामुळे येथील मतदारही सुशिक्षित उमेदवाराच्या मागे उभे राहतील. सुजय विखेंच्या नावातच जय असल्यामुळे त्यांचा पराजय होणं अशक्य आहे. आता आपल्याला फक्त त्यांचे लीड वाढवायचं आणि विरोधकांच्या ‘लंके’चं दहन करायचं आहे”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केली.

अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

हेही वाचा : भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. बाकीच्या सर्व गॅरंटी फेल झाल्या आहेत. फक्त एकच गॅरंटी येथे चालती ती म्हणजे मोदी गॅरंटी. इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये माणसांना बसण्यासाठी डब्बे नाहीत. मात्र, नरेंद्र मोदींच्या इंजिनला डब्बेच डब्बे आहेत. त्यामुळे आता आपल्याला सुजय विखे यांना दिल्लीला पाठवायचे आहे. नरेंद्र मोदींच्या नखाची सरदेखील इंडिया आघाडीला येणार नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीवर निशाणा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नो लंके, येथे फक्त विखे. ड्रामा करुन लोक निवडून येत नाहीत. त्यासाठी काम करावं लागतं. लोकांच्या दु:खात सहभागी व्हावं लागतं. विखे पाटील परिवार किती वर्षांपासून येथे काम करत आहे. या ठिकाणी विखे पाटलांची मुळं इतकी खाली गेले आहेत की महाविकास आघाडीचं वरुन कुणी आलं तरी ते उखडू शकत नाहीत”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरच्या सभेतून महाविकास आघाडीवर केला.

Story img Loader