२२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

“नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये भाषण केलं. ते म्हणाले की काँग्रेसची सत्ता आली तर ते मी आणलेल्या योजना काढून घेतील. राम मंदिरही त्यात आलं असं ते म्हणाले. गहू आणि तांदूळ देतात ती योजनाही आमचीच आहे. आम्ही काही त्या योजना बंद करणार नाही. तसंच गरीबांना आम्ही प्लॅस्टिकचे तांदूळ देणार नाही. योग्य प्रमाणात अन्न, धान्य आणि साखर देणार. ” असा टोला नाना पटोलेंनी लगावला आणि राम मंदिराबाबत भाष्य केलं.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”

हे पण वाचा- राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर काय होणार? बांधकाम पूर्ण होण्याबाबत अध्यक्षांनी दिली माहिती

राम मंदिराचं शुद्धीकरण करणार

“आम्ही सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार आहोत. कारण आमच्या सनातन धर्माच्या चार शंकराचार्यांनी या विधीला विरोध केला होता. त्यामुळे चार शंकराचार्यांना आम्ही बोलवू आणि राम मंदिराचं शुद्धीकरण करुन घेऊ. तसंच त्या मंदिरात आम्ही राम दरबार स्थापन करु कारण आत्ता त्या मंदिरात राम दरबार नाही. मूळ जी मूर्ती बाजूला सारण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार मंदिरात सजवू. तसंच शंकराचार्यांच्या हस्ते आम्ही मंदिराचं शुद्धीकरण करु, कारण त्यांचंच हे म्हणणं आहे की जो विधी झाला तो धर्माला धरुन झाला नाही. आम्ही सुधारणा करु. धर्माच्या आधारावर सुधारणा करु, अधर्माच्या नाही. नरेंद्र मोदींनी केलं ते अधर्माच्या आधारावर सगळं केलं असाही टोला नाना पटोलेंनी लगावला.

शरद पवारांच्या विलीनकरणाच्या वक्तव्याबाबत काय म्हणाले नाना ?

“राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी मला सांगितलं की देशभरात भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा परिणाम जाणवतो आहे. त्यामुळे काँग्रेस हाच पर्याय आहे असं प्रादेशिक पक्षांना वाटतं आहे. याच आधारावर शरद पवारांनी विलीनीकरणाचं वक्तव्य केलं असेल.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण असल्याच्या कारणावरुन मंदिराची प्राणप्रतिष्ठा पुढे ढकलावी असं आवाहन केलं होतं. मात्र २२ जानेवारीलाच हा सोहळा पार पडला. आता नाना पटोलेंनी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल असं म्हटलं आहे.

Story img Loader