सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू आहे. मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अंतिम जागावाटप जाहीर केले. तरीही सांगलीमधील नेत्यांना हा निर्णय रुचला नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जागावाटपात सांगली मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा दाखल केला असला तरी काँग्रेसने आणि मविआने पुन्हा एकदा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.

विश्वजीत कदम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्ष निवडणूक लढवत आहेत. जागावाटपाबाबत तीनही पक्षांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा सुरू असताना सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत होतो. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. राष्ट्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांना आम्ही या मतदारसंघाबाबत विनंती केली होती. सांगलीतून लढण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही सांगितले होते.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
लाडक्या बहिणींची महायुतीकडून फसवणूक; दिलेली मते परत घेणार का, उद्धव ठाकरे यांचा सवाल
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”

सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी

“सांगली जिल्ह्यात मविआचे अनेक आमदार आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थेमध्ये काँग्रेसच्या विचारांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा, अशी आमची मागणी होती. कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शिवसेनेचा हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. मात्र सांगलीच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली”, असा आरोप विश्वजीत कदम यांनी केला.

मविआची गुढीपाडव्याला पत्रकार परिषद झाली असून त्यांनी अंतिम जागावाटप जाहीर केले आहे. त्यानुसार आता चित्र स्पष्ट झाले आहेच. तरीही सांगलीच्याबाबतीत महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी लावून धरली. तसेच पुढील काही दिवस कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे काम विशाल पाटील आणि मी करेन असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले.

Story img Loader