DCM Devendra Fadnavis Mahayuti Press conference : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. महायुती सरकारने आज गेल्या सव्वा दोन वर्षातील कामांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेमार्फत मांडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडवी टीका केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदे घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंखनाद या एका शब्दाने एक्स पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असं त्यांना म्हणायचं होतं. आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींतरा ऐलान झाला आहे.”

Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
pm narendra modi at maha kumbh
पंतप्रधानांचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नान; महाराष्ट्र ते दिल्ली! मतदानाच्या दिवशीच मोदी काय काय करतात?
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

हेही वाचा >> Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

कामाची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती

“आज या निमित्ताने आमच्या महायुती सरकारने सव्वा दोन वर्षांत जे काही कार्य केलंय त्याचं रिपोर्ट कार्ड ठेवतोय. हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे. स्थगिती सरकार गेल्यानंतर गतीचं आणि प्रगतीचं सरकार आलं. ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकराने परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या. या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती सांगण्याऱ्या आहेत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

“निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमच्या समोरची लोकं सातत्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण सर्व निवडणूक आयोगाच्या हातात असतं. त्यांना स्वायत्ता दिली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भाजपा-शिवसेना सरकार अस्तित्वात आलं. वर्षभराने आम्ही (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) समाविष्ट झालो. गेले दीड वर्षे सर्वजण काम करतोय. २०२२-२४ चं रिपोर्ट कार्ड देत असातना सातत्याने आमच्याबद्दल सांगितलं जातं की तिजोरी मोकळी केली आहे, कर्जबाजारी झालो आहोत. मी अतिशय जबाबादारीने सांगतोय, निवडणुका जवळ येत असताना खूप कॅबिनेट होतात. तेव्हा अनेक निर्णय घेतले जातात. शेवटी शेवटी काही राहून गेलेले विषय येत असतात. त्यातून विषय मंजूर करतो. काही विचारपूर्वक योजना दिल्या. या योजनांची टिंगळटवाळी झाली, बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली, महिला समाधानी आहेत. सर्व घटकांतील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काहीही बोलण्याचा प्रयत्न होत आहे. आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण काहीतरी तारतम्य ठेवण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader