मुंबईत ज्या ठिकाणी शिवसेनेची मतं आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु असून निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे रडगाणं सुरू केलं आहे, असं ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…तर निवृत्ती घेतली असती”; फडणवीसांचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, “जर वेळ आली”

Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली होती. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना, माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – “…तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मुंबईत संथगतीने मतदान सुरु असल्याच्या तक्रारींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तसेच त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं होतं. “आज महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. त्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. यावेळी मतदारांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांची खूप गर्दी आहे. मात्र, ज्या मतदान केंद्रावर शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पराभवाच्या भीतीने जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून ते केवळ भाजपाच्या इशाऱ्यावर काम करते आहे”, असे ते म्हणाले होते.

Story img Loader