Ravindra Chavhan in Dombivli Assembly Constituency : २००९ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला होता. तेव्हापासून या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून रवींद्र चव्हाण आमदार राहिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख आहे. या मतदारसंघात मराठी (खासकरून कोकणी), गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक राहत असल्याने त्यांचं एकगठ्ठा मतदान भाजपाला होत आलं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती. तर, २०१९ मध्येही भाजपा, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. राज्याच्या राजकारणात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता महायुतीकडून या मतदारसंघावर कोण दावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण हे मंत्री असून गेल्या तीन टर्मपासून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येत आहेत. परंतु, डोंबिवलीतील रखडलेली अनेक कामे, वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, एमआयडीसीला लागत असलेल्या आगी आदी प्रश्न अद्यापही सुटलेले नसल्याने तसंच, मंत्री असूनही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास न नेल्याने त्यांच्याविरोधातही वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तरी यंदा त्यांना महाविकास आघाडीला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

हेही वाचा >> Nanagaon : नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण आणि भुजबळांशी वैर, यावेळी कांदे गड राखणार?

तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर कोणीही दावा केला तरी त्यांना भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातील निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. भाजपाचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे स्पष्ट आहे. तसंच २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना मनसेचे श्रीकांत हळबे यांनी टफ फाईट दिली होती. श्रीकांत हळबे यांना ४१ हजार ३११ मते मिळाली होती. तर, रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते मिळाली होती. मनसेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगलेच वर्चस्व आहे. तसंच, कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आहेत. त्यांचाही आजूबाजूच्या शहरात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे मनसेही या जागेवरून उमेदवार उभा करू शकतो. परिणामी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिहेरी लढत यंदाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात किती मतदार?

हा मतदारसंघ खुला प्रवर्गातील असून येथे २०१९ च्या आकडेवारीनुसार एकूण मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार ३३० एवढी आहे. यामध्ये १ लाख ७४ हजार ५४४ पुरुष मतदार आणि १ लाख ६३ हजार ७३४ महिला मतदार आहेत. २०१९ मध्ये ४४.७२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किती टक्के मतदान होतंय, कोणाला होतंय यावर इतर गणितं अवलंबून आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख आहे. या मतदारसंघात मराठी (खासकरून कोकणी), गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक राहत असल्याने त्यांचं एकगठ्ठा मतदान भाजपाला होत आलं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती. तर, २०१९ मध्येही भाजपा, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. राज्याच्या राजकारणात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता महायुतीकडून या मतदारसंघावर कोण दावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण हे मंत्री असून गेल्या तीन टर्मपासून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येत आहेत. परंतु, डोंबिवलीतील रखडलेली अनेक कामे, वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, एमआयडीसीला लागत असलेल्या आगी आदी प्रश्न अद्यापही सुटलेले नसल्याने तसंच, मंत्री असूनही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास न नेल्याने त्यांच्याविरोधातही वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तरी यंदा त्यांना महाविकास आघाडीला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

हेही वाचा >> Nanagaon : नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण आणि भुजबळांशी वैर, यावेळी कांदे गड राखणार?

तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर कोणीही दावा केला तरी त्यांना भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातील निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. भाजपाचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे स्पष्ट आहे. तसंच २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना मनसेचे श्रीकांत हळबे यांनी टफ फाईट दिली होती. श्रीकांत हळबे यांना ४१ हजार ३११ मते मिळाली होती. तर, रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते मिळाली होती. मनसेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगलेच वर्चस्व आहे. तसंच, कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आहेत. त्यांचाही आजूबाजूच्या शहरात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे मनसेही या जागेवरून उमेदवार उभा करू शकतो. परिणामी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिहेरी लढत यंदाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात किती मतदार?

हा मतदारसंघ खुला प्रवर्गातील असून येथे २०१९ च्या आकडेवारीनुसार एकूण मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार ३३० एवढी आहे. यामध्ये १ लाख ७४ हजार ५४४ पुरुष मतदार आणि १ लाख ६३ हजार ७३४ महिला मतदार आहेत. २०१९ मध्ये ४४.७२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किती टक्के मतदान होतंय, कोणाला होतंय यावर इतर गणितं अवलंबून आहेत.