Lok Sabha Election Exit Poll Result: सध्या देशभर एक्झिट पोल्सची चर्चा पाहायला मिळत आहे. जवळपास सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणीत एनडीएला ३५० हून जास्त जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळण्याची शक्यता नमूद केली आहे. या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आम आदमी पक्षाला दिल्ली, हरियाणा व पंजाबमध्ये मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागेल, असा अंदाज समोर आला असून त्यावर आपचे नेते संजय सिंह यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय सिंह?

आम आदमी पक्षाला दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल, अशा अंदाजावर संजय सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “पहिली गोष्ट म्हणजे एक्झिट पोल भाजपाच्या कार्यालयात तयार करण्यात आले आहेत. सर्व वाहिन्यांवरचे आकडे जवळपास सारखेच आहेत. कुणाला विश्वास बसेल की भाजपाला तामिळनाडूत ३४ टक्के मतं मिळणार आहेत? कुणाला विश्वास बसेल की आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये ० ते २ जागा मिळतील? तुम्ही असे आकडे देत आहात की ज्यावर लोक हसत आहेत”, असं संजय सिंह एएनआयवर म्हणाले.

Delhi Exit Poll
Delhi Election : “चौथ्यांदा असं घडतंय…”, एक्झिट पोलमधील अंदाज विरोधात असूनही ‘आप’ला का आहे विजयाची खात्री
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Delhi Exit Poll
दिल्लीत भाजपा सत्तेत येण्याचा Exit Poll चा अंदाज; गेल्या तीन निवडणुकांमध्ये किती अचूक होते एक्झिट पोल
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Delhi Assembly Elections 2025 Live Updates in Marathi
Delhi Exit Poll Results 2025 : “दिल्लीत आम्हीच सत्ता स्थापन करू”, Exit Poll नंतर आम आदमी पक्षाचा दावा
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष

“आपचा सगळ्यात जास्त राग भाजपाला आहे. त्यामुळे भाजपानं आपल्या कार्यालयात सांगितलं की पंजाबमध्ये आपला ० ते २ जागा मिळतील असं लिहा. तसं वाहिन्यांनी दाखवलं. त्यामुळे हा एक्झिट पोल भाजपाच्या कार्यालयात बनवण्यात आला आहे. हा मोदी सरकारचा एक्झिट पोल आहे. हा एक्झिट पोल जनतेचा खरा कौल दाखवत नाही. इंडिया आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षांनी जो सर्व्हे केला, त्यानुसार इंडिया आघाडीला देशभरात २९५ हून जास्त जागा मिळतील”, असंही संजय सिंह म्हणाले.

“एक्झिट पोल्सची चेष्टा लावली आहे”

“कुणी ३५० जागा एनडीएला दिल्या आहेत, कुणी ४०० दिल्या आहेत. मला तर आश्चर्य वाटतंय की भाजपाला फक्त ४०० जागा कशा दिल्या गेल्या? अखंड भारतात त्यांच्या ७०० जागा निवडून येऊ शकतात. पाकिस्तानमधून शंभरेक जागा येतील, नेपाळमधून ५० निवडून येतील, ५० अफगाणिस्तानातून, ५० बांगलादेशातून, ३०-३५ श्रीलंकेतून, २०-२५ थायलंडमधून निवडून येतील. काही इंडोनेशियातून जिंकून येतील. अखंड भारतातून ७०० जागा द्या ना भाजपाला. एक्झिट पोल्सची चेष्टा लावली आहे”, अशी खोचक टीका संजय सिंह यांनी केली.

Exit Poll 2024 : काँग्रेसला एक्झिट पोल्सचे अंदाज अमान्य; पवन खेरा म्हणाले, “२००४ साली अटल बिहारी वाजपेयींना…”

“यामागे काय कारण असेल? एकतर तुम्ही खूप मोठा फेरफार केला आहे. त्याला सिद्ध करण्यासाठी हे असे एक्झिट पोल दिले आहेत. या सर्व एक्झिट पोलवाल्यांना जनतेच्या मताची अजिबात माहिती नाही. तुम्ही कुठेही जा, लोकांमध्ये महागाई, बेरोजगारीबाबत नाराजी आहे. पण तुमचे आकडे सांगतायत की भाजपा चहुबाजूंनी जिंकत आहे. हे कसं शक्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader