गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरोधात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे बंडखोर पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय. पणजीमधून भाजपाचे बाबूश मोन्सेरात विजयी झालेत.

“अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया पर्रिकरांच्या मुलाने दिली आहे. उत्पल पर्रिकरांना उमेदवारी न मिळाल्याची चर्चा देश पातळीवर झाली होती. त्यामुळे पणजी येथील निवडणूक प्रतिष्ठेचा विषय ठरला होता.

काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले?

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने २१ जानेवारी रोजी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता..

आपल्या नैतिक मूल्यांसाठी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मला पणजीतून उमेदवारी नाकारली, याचा अर्थ पक्षात कुणाचा तरी मला विरोध आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असं उत्पल यांनी पक्ष सोडताना म्हटलं होतं.

Story img Loader