गोव्यातील निवडून आलेल्या आमदारांनी जनादेशाचा अशाप्रकारे अपमान केला आहे, की जो देशातील अन्य कोणत्याही राज्यात झाला नाही. निवडणूक यंत्रणा आणि राजकारण्यांवर नजर ठेवणाऱ्या एडीआरच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत सुमारे २४ आमदारांनी पक्ष बदलले आहेत, ज्यांची संख्या ही ४० सदस्यीय विधानसभेच्या ६० टक्के आहे.

एडीआरच्या अहवालात म्हटले आहे की, सध्याच्या विधानसभेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ४० पैकी २४ आमदारांनी पक्ष बदलला आहे. भारतात असे कुठेही घडले नाही. हे जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. नेत्यांनी राजकारणातील नैतिकता आणि शिस्तीचेही उल्लंघन केले आहे.

Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

एडीआरने आपल्या अहवालात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेल्या आणि भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या नेत्यांची नावे समाविष्ट केलेली नाहीत. तर, या नेत्यांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांचा समावेश आहे. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. नंतर दोघेही पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

२०१७ मध्ये काँग्रेसने सुमारे १७ जागा जिंकल्या होत्या. पण आज देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रसचे विधानसभेत फक्त दोन सदस्य आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि सुमारे १० आमदार भाजपामध्ये सहभागी झाले. त्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, जेनिफर मॉन्सेरेट, फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो, क्लॅफसिओ डायस, अँटोनियो कॅरानो फर्नांडिस, नीळकंठ हालरंकर, इसिडोर फर्नांडिस, अटानासिओ मोन्सेरात यांचा समावेश होता.

त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवी नायक यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि आमदार लुइझिन्हो फालेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. तसेच, काँग्रेसचे आमदार अॅलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोव्यात पक्षांतराचे वारे वेगात ; भाजपला दुहेरी धक्का : एका मंत्र्यासह आमदाराची सोडचिठ्ठी

याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार जयेश साळगावकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) आमदार दीपक पौसकर आणि मनोहर आजगावकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. याशिवाय अपक्ष आमदार रोहन खुंटे आणि गोविंद गावडे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. आणखी एक अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोव्यात मंत्र्याचा भाजपप्रवेश

तसेच, भाजपच्या काही आमदारांनीही पक्ष सोडला. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामध्ये गेलेले प्रवीण झांटे, काँग्रेसमधील मायकेल लोबो, जोस लुईस कार्लोस आल्मेडा यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपा आमदार अलिना सलदान्हा यांनी देखील आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. सध्या विधानसभेत काँग्रेसचे केवळ दोन तर भाजपाचे २७ आमदार आहेत.

Story img Loader