राजस्थानात भाजपाची सत्ता येणार हे आता नक्की झालं आहे. कारण भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राजस्थानमध्ये सत्तास्थापनेसाठी १०० ही मॅजिक फिगर आहे. अशात भाजपाने ११० हून अधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. आता पुढच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे होऊ शकतात. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदल होतो तसाच तो यावेळीही बघायला मिळाला आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानची जनता सूड घेईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत अशोक गहलोत?

“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी सगळ्यांनी उत्तम प्रकारे प्रचार केला. आमच्या योजनाही चांगल्या होत्या. आम्ही हवेतली आश्वासनं दिली नव्हती. आता पराभव झाला आहे तर तो स्वीकारला पाहिजे. आम्ही आता लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागणार आहोत. माझं काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगणं आहे की निवडणूक म्हटली की त्यात जय-पराजय होत असतातच. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि बाहेरुन काही मुख्यमंत्रीही आले होते. माझ्यावर जोरदार टीका केली, आमचं सरकार भाजपाला पाडायचं होतं आणि लोकशाहीची हत्या करायची होती. अशा भाजपाला जनता धडा शिकवेल आणि मतपेटीतून त्यांचा सूड घेईल असं वाटलं होतं. मात्र असं घडलं नाही. जनतेने बदला घेतला नाही. कदाचित त्यांना हे समजलं नसावं.” असं वक्तव्य आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं आहे.

petitioner demand in bombay hc to file case against eknath shinde and nitesh rane over anti muslim remarks
मुस्लिमविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री शिंदे आणि नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करा, याचिकेद्वारे मागणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
arvind kejriwal latest news (1)
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान?
Congress city president MLA Vikas Thackeray
“आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी”, काय म्हणाले काँग्रेस आमदार…
eknath shinde on cm post,
CM Ekath Shinde : एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…

राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये यशस्वी ध्रुवीकरण आणि गुर्जर, जाट, राजपूत या प्रमुख जातींची अनुकुलता भाजपसाठी सत्ता मिळवून देणारी ठरली. भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली.

राजस्थानमधील अंतर्गत संघर्षामुळे त्रस्त झालेल्या भाजपाने वसुंधरा राजेंसारख्या दिग्गज नेत्यांची मक्तेदारी मोडून काढत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला होता. त्याऐवजी दियाकुमारी, बाबा बालकनाथ, विरोधीपक्षनेते राजेंद्र राठोड यांच्यासह केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव आदी नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत ठेवली होती. वसुंधरा राजेंचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्या समर्थक आमदारांना उमेदवारी दिली गेली असली तरी, निवडणुकीच्या प्रचारातून राजेंना दूर करून संपूर्ण निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढली गेली. राजस्थानमध्ये मोदी हेच भाजपाचे प्रमुख प्रचारक होते!