तेलंगणात तिसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) काँग्रेसनं मोठा धक्का दिला आहे. तेलंगणात काँग्रेस ६० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, बीआरएस ४० जागांवर आघाडीवर दिसत आहे. काँग्रेसची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. यातच बीआरएसचे नेते, के.टी रामाराव यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे.

‘एक्स’ अकाउंटवर के.टी रामाराव म्हणाले, “सलग दोनवेळा बीआरएसचे सरकार निवडून दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार व्यक्त करतो. आजच्या निकालाबद्दल दु:खी नाही. पण, निश्चितपणे निराश झालो आहे. कारण, हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. मात्र, या निकालातून धडा घेऊन आणि पुन्हा ताकदीने उभारू.”

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
atishi takes charge as delhi cm with empty chair
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Congress on Madhabi Puri Buch :
Congress on Madhabi Puri Buch : “माधबी पुरी बूच यांनी कोट्यवधींची…”, काँग्रेसच्या नव्या आरोपाने खळबळ

“काँग्रेसला मिळालेल्या बहुमताबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा,” असं के.टी रामाराव यांनी म्हटलं आहे.

के.टी रामाराव यांच्या ट्वीटवर रेवंत रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “के.टी रामाराव यांची ही भावना आता सरकार चालवताना राहिली पाहिजे. कारण, १० वर्षे झाले तुम्ही सरकारमध्ये होता. आता विरोधी पक्षात बसणार आहात. धोरणे आम्ही बनवणार, सूचना देण्याचं काम विरोधी पक्षाचं असणार आहे. गरिब लोकांच्या मदतीसाठी काँग्रेस नेहमी प्रयत्न करणार आहे,” असं रेवंत रेड्डींनी सांगितलं.