द्वेषपूर्ण भाषण आणि चुकीचा संदेश दिल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल नोटीस बजावली आहे. २९ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत भाजपा आणि काँग्रेसला या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला होता.

निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ अनुसार दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

Jharkhand BJP
झारखंड विधानसभा निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच भाजपाच्या १२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पक्षावर घराणेशाहीचा आरोप
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
vidarbh congress and shivsena
परस्परांविरुद्ध लढणारे एकत्र आल्याने विदर्भात पेच; काँग्रेस-शिवसेना रस्सीखेच, इच्छुकांचे यादीकडे डोळे
MP Amar Kale is trying for his wife Mayura Kales candidacy
पत्नीच्या तिकिटासाठी खासदार प्रयत्नशील, मात्र काँग्रेस नेत्यांचा विरोध
Nana Patole, Nana Patole news, Congress leaders upset with Nana Patole,
तिकीट वाटपातील पटोलेंच्या भूमिकेने काँग्रेस नेते नाराज ? विश्वासात घेतले जात नसल्याची भावना
Ramtek, Congress, Shivsena, Ramtek Shivsena,
रामटेकच्या बदल्यात कोकणात जागा, काँग्रेसचा शिवसेनेला प्रस्ताव
Haryana assembly bjp victory
जाटेतर, दलित, अपक्षांची साथ; हरियाणामध्ये भाजपच्या विजयात इतर मागासवर्गीयांचा महत्त्वाचा वाटा
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते

निवडणूक आयोगाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार करत असताना त्याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहीजे. उच्च पदस्थ नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांचा ओबीसीत समावेश, पंतप्रधानांच्या आरोपांनंतर मागासवर्ग आयोगाचा खुलासा; केला ‘हा’ सवाल!

सोमवारी (दि. २२ एप्रिल) भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. देशात गरिबी वाढल्याचा दावा राहुल गांधी आपल्या भाषणातून करत आहेत, या दाव्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच राहुल गांधी आपल्या भाषणातून उत्तर आणि दक्षिण भारतात भाषा आणि भौगोलिक रचनेवरून फूट पाडत आहेत, असाही आरोप भाजपाने केला आहे.

निवडणूक आयोगाच्या नोटीशीनंतर काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश म्हणाले की, भाजपाकडून ज्याप्रकारे धर्माचा गैरवापर होत आहे. तो गंभीर असून चिंताजनक आहे. याबद्दल आम्ही निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. आम्हालाही नोटीस प्राप्त झालेली आहे. त्याचे आम्ही उत्तर देऊ.