२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची अनेक वर्षांपासूनची युती तोडली. तसेच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष चालू आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षाचे दोन गट तयार झाले. यापैकी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मोठा गट भाजपाबरोबर गेला आणि त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर शिवसेनेचा दुसरा गट (उद्धव ठाकरे) आणि भाजपातील संघर्ष चालूच आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजपातील संघर्षावर आणि दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमधील जिव्हाळ्याच्या संबंधांवर भाष्य केलं. मोदी यांनी टीव्ही ९ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा