देशभर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान चालू आहे. दुसऱ्या बाजूला, ज्या ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमध्ये (पाचवा, सहावा आणि सातवा टप्पा) मतदान होणार आहे तिथे अद्याप प्रचार चालू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ मे) बिहारच्या मुजफ्फरपूर येथे एनडीए उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही काँग्रेसवर निशाणा साधला. मणिशंकर अय्यर म्हणाले होते की “भारताने पाकिस्तानशी सुसंवाद राखावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो.”, यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हे काँग्रेसवाले पाकिस्तानला घाबरून राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या देशभर भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं वादळ घोंगावतंय. बिहारमध्येही तीच परिस्थिती मला पाहायला मिळत आहे. मी आता बिहारमध्ये पाहतोय की इथे जंगल राजवाला पक्ष भुईसपाट होत आहे. मी देशभर जिथे जातोय, बिहारमध्ये जिथे जिथे आतापर्यंत गेलो आहे त्या प्रत्येक ठिकाणी मला एकच गोष्ट ऐकायला मिळाली, ती म्हणजे ‘फिर एक बार मोदी सरकार’ची घोषणा. माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की ही निवडणूक म्हणजेच देशाची निवडणूक आहे, आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य ठरवण्याची निवडणूक आहे, देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवण्याची निवडणूक आहे, ही गोष्ट लक्षात घेऊनच तुम्ही मतदान करा.

Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
pm modi pakistan visit
नेहरू ते मोदी; कोणकोणत्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली? तेव्हा नक्की काय घडले? पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का?
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
Rahul Gandhi farukh Abdullah marathi news
काँग्रेस – नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, तरी काश्मीर खोऱ्यात मैत्रीपूर्ण लढती?
congress chief claim govt u turn on lateral entry
आमच्यामुळेच निर्णय रद्द!‘थेट भरती’वरून काँग्रेस अध्यक्षांचा दावा, ‘इंडिया’ नेत्यांची सरकारवर टीका
Rahul Gandhi in the fifth row at the Independence Day ceremony at the Red Fort
राहुल गांधी पाचव्या रांगेत, काँग्रेसचा आक्षेप

हे ही वाचा >> “मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशकात उतरवल्या नऊ बॅगा”, VIDEO शेअर करत संजय राऊत म्हणाले, “त्यामध्ये तब्बल…”

पंतप्रधान मोदी म्हणाले, मला माहिती आहे की आपल्या देशाला काँग्रेसचं कमकुवत, भित्रं आणि अस्थिर सरकार अजिबात नको आहे. आपल्याला आपल्या परिसरात कमकुवत पोलीस किंवा कमकुवत शिक्षक कधीच नको असतो. त्याचप्रमाणे कमकुवत पंतप्रधान निवडून कसं चालेल? आपल्याला आपल्या परिसरातला पोलीस असो, शिक्षक असो किंवा देशाचा पंतप्रधान असो, तो मजबूतच हवा असतो. भित्रा पंतप्रधान कसा चालेल? हे काँग्रेसवाले खूप घाबरलेले आहेत. हे लोक इतके घाबरलेत की यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो. काँग्रेस सारखे हे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना रात्री झोपेतही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो. या काँग्रेसवाल्या लोकांची, इंडिया आघाडीतल्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये ऐकली तरी हसू येतं, तसेच हे लोक किती भित्रे आहेत ते समजतं.