देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत असून दोन टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर ७ मे रोजी मतदान पार पडेल. त्यामुळे सर्व पक्षांनी सध्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काल कोल्हापुरात तर आज सोलापूर, सातारा आणि पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. सोलापूरमधील भाजपा उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ सोलापुरात घेतलेल्या सभेत मोदी यांनी आरक्षणावर भूमिका मांडली.

देशभरातील विरोधी पक्ष सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत की मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकांचं आरक्षण काढून घेतील. भाजपाला संविधानात त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घेण्यासाठी लोकसभेच्या ४०० जागा जिंकायच्या आहेत. असे आरोप विरोथकांकडून होत आहेत. या आरोपांना मोदी यांनी सोलापूरच्या सभेतून उत्तर दिलं.

Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
extradition with India for Sheikh Hasina
शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील (ओबीसी) लोकांशी विश्वासघात केला आहे. त्यामुळे या समाजातील लोकांचा आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. ते आता काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला कंटाळले आहेत. त्यामुळेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले लोक थोडेसे गडबडले आहेत, गोंधळले आहेत. त्यातून ते लोक आता खोट्या अफवा पसरवू लागले आहेत. ते आता म्हणत आहेत की आम्ही (भाजपा) संविधान बदलू, आम्ही आरक्षण संपवू. काँग्रेसवाले अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. परंतु मी याआधी देखील सांगितलं आहे की आज स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी वाटलं तर तेसुद्धा आपल्या देशातलं आरक्षण संपवू शकत नाहीत, त्यामुळे मोदींचा तर प्रश्नच येत नाही.

हे ही वाचा >> “महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

पंतप्रधान मोदी काँग्रेसवर टीका करत म्हणाले, भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचं स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे. त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचीदेखील तयारी आहे. त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपवल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल. त्यांनी याआधीदेखील सत्तेसाठी देशाचं विभाजन केलं आहे.