महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना होऊन आता १८ वर्षे झाली आहेत. या १८ वर्षांच्या काळात मनसेने अनेक चढ-उतार पाहिले. पक्ष स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात हा पक्ष राज्यात जोमात होता. मात्र नंतरच्या काळात पक्षाची मोठी अधोगती झाली आहे. पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा, शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये गेले. राज ठाकरेंचा राज्यभरातला करिष्मा कायम असला तरी त्यांच्या पक्षाला निवडणुकीत फारशी मतं मिळताना दिसत नाहीत. राज ठाकरेंच्या सभांना खूप मोठी गर्दी होते. मात्र त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही. याचं महाराष्ट्रातल्या राजकीय विश्लेषकांना, जनतेला आणि राज ठाकरेंच्या चाहत्यांना देखील कुतूहल आहे. यावर राज ठाकरे यांनी परखड भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी (३ मे) बोलिभिडूला दिलेल्या मुलाखतीत मनसेची आजवरची कामगिरी आणि पुढील ध्येयांबाबत माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, लोक अडचणीच्या काळात राज ठाकरेंच्या घराचं दार ठोठावतात, वेगवेगळ्या संघटना आणि लोक मदतीसाठी कृष्णकुंजवर (राज ठाकरे यांचं निवासस्थान) जातात. मात्र निवडणुकीच्या काळात हेच लोक राज ठाकरेंना मतदान का करत नाहीत? मतदानाच्या वेळी पाठ का फिरवतात? यावर राज ठाकरे म्हणाले, लोक मतं देतील. हा एक उताराचा टप्पा आहे. हा टप्पा संपेल.

India alliance
“इंडिया आघाडी अबाधित, पुढच्या लोकसभा निवडणुकीत…”, दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत
Narendra Modi
Delhi Election Result : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका…
narendra modi
Delhi election Result : “भाजपाने दिल्ली जिंकली म्हणजे…”, दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबाबात जगभरातील माध्यमांनी काय म्हटलंय?
Bhagwant Mann VS Arvind Kejriwal
AAP Politics : केजरीवालांना मोठा धक्का बसणार? ‘भगवंत मान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात’, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने ‘आप’मध्ये खळबळ
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्ली निवडणुकीत ‘येथे’ अवघ्या ३४४ मतांनी ‘आप’च्या उमेदवाराचा पराभव… सर्वाधिक मताधिक्याने कोण जिंकलं?
Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
Delhi Election Result 2025 AAP Politics
Delhi Election : ‘आप’च्या पराभवानंतर घडामोडींना वेग, उपराज्यपालांनी दिले मोठे आदेश; दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदी, कारण काय?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, दिल्लीच्या निकालावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान

राज ठाकरे म्हणाले, लोक मतं देतील देतील, यापूर्वी देखील त्यांनी मनसेला मतं दिली आहेत. पक्ष स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत माझे १३ आमदार निवडून आले होते. त्याचवेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांना लाख लाख, दीड लाख, दोन लाख मतं मिळाली होती. परंतु, असाही एखादा टप्पा येतोच. तुम्ही माझ्या पक्षाच्या १८ वर्षांचं काय घेऊन बसला आहात, १९५२ साली सुरू झालेल्या जनसंघाला २०१४ साली पहिल्यांदा बहुमत मिळालं होतं. मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं होतं. मात्र ते एकट्या भाजपाचं सरकार नव्हतं. अनेक पक्षांनी मिळून बनवलेले ते सरकार होतं. मात्र खऱ्या अर्थाने तेव्हाच्या जनसंघाला म्हणजेच आजच्या भाजपाला २०१४ मध्ये सत्ता मिळाली. किती मोठा काळ गेला बघा. परंतु, त्या भाजपाला कोणी प्रश्न विचारला का, की पक्ष स्थापन करून इतकी वर्षं झाली, परंतु इतक्या वर्षांमध्ये लोकांनी तुम्हाला मतं का दिली नाहीत?

हे ही वाचा >> नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत

शिवसेनेची परिस्थिती देखील भाजपासारखीच आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. मात्र शिवसेनेला १९९५ मध्ये सत्ता मिळाली. प्रत्येक पक्षाला एवढा काळ द्यावाच लागतो. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचायला एवढा वेळ नक्कीच लागला आहे. मात्र सध्याची मानसिकता अशी आहे की वडा टाकला की तळून आला पाहिजे. पण मी बटाटे आणायला जाणार नाही, माझ्या हातात बटाटा वडा तयार करून द्या, अशी अनेकांची मानसिकता आहे. माझ्या हातात फक्त बटाटा वडा द्या मी तो तेलात टाकतो, तळून आला की खातो. परंतु त्यासाठी मी पीठ तयार करणार नाही, बटाटे शिजवून घेणार नाही. आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेणार नाही. हे सगळं करण्याची कोणाची तयारीच नाही, त्यात कोणाला रसच नाही

Story img Loader