आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु, जागा वाटपाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होणार आहे. परंतु, या दोन्ही आघाड्यांमध्ये असलेल्या घटकपक्षांमुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीय. आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही महायुतीमध्ये मतभेद आहेत. या जागेवरून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेनेही दावा केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यात या जागेवरून जुंपली आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी या जागेवर दावा केला आहे. “सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचाच आहे. या जागेसाठी मी कोणाशी बोलायला गेलो नाही. मला तिकिट द्या, असं मी माझ्या नेत्याला बोललेलो नाही. भाजपाचे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पालिकेत भाजपाची सत्ता आहे. ही सर्व ताकद असताना आम्ही हा मतदारसंघ सोडणार का? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला.

Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mirkarwada latest news martahi news
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात न्यायालयाचे जिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्स
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
lokmanas
लोकमानस: सर्वसमावेशक अर्थसंकल्पाची अपेक्षा
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
ulta chashma
उलटा चष्मा: कोण म्हणतं गरीब जिल्हा?

या जागेवर शिंदे गटाने उमेदवार देणार असल्याचं म्हटल्याने नारायण राणे म्हणाले, कोण उमेदवार? उदय सामंतचा उमेदवार कोण? मला त्यांच्या नावाला विरोध नाही. पण मी सांगतो येथे भाजपाचाच उमेदवार येणार”, असं नारायण राणेंनी स्पष्ट केलं.

उदय सामंत काय म्हणाले?

“या मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे या जागेबाबत तेच निर्णय घेतील. येत्या दोन दिवसांत सर्व शंकांचं निरसन होऊन ४८ च्या ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली जातील”, असं उदय सामंत म्हणाले.

“या जागेवरून मागच्या वेळी शिवसेना लढली होती. या जागेवर आता शिवसेनेचा खासदार आहे. परंतु, ते दुसऱ्या गटात असल्याने ही जागा आता आम्हाला मिळायला हवी, त्यामुळे आम्ही येथे दावा केला आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

Story img Loader