काँग्रेस तेलंगणात अभूतपूर्व यश मिळवण्याच्या तयारीत आहे. सत्ताधारी बीआरएस पक्षाला धोबीपछाड करत काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. काँग्रेसने कर्नाटकातही सत्ताधारी भाजपाला धुळ चारत सत्ता स्थापन केली होती. या दोन्ही यशात एका गोष्टीत साम्य आहे, ते म्हणजे निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू.

“तेलंगणात आम्हाला मोकळे हात देण्यात आले. आम्ही अंतर्गत सर्वेक्षण केले आणि त्यानुसार काम केले. त्यामुळे पक्षातील नेत्यांचा विजयात हातभार लागला नाही, असे म्हणता येणार नाही. त्यांनी नेहमी आमचं ऐकलं आणि आमच्या सल्ल्याकडे लक्ष दिले”, कानुगोलू फर्मच्या वरिष्ठ सदस्याने नाव न सांगण्याच्या विनंतीवरून ही माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Hathras Satsang Stampede anti superstition law demanded by Mallikarjun Kharge in Rajya Sabha Jadutona virodhi kayada
हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत अंधश्रद्धाविरोधी कायद्याची मागणी; काय आहे महाराष्ट्रात लागू असलेला हा कायदा?
Manipur crisis PM Narendra Modi hits back in Rajya Sabha Opposition
“हिंसाचारावरुन राजकारण करणाऱ्यांना मणिपूरची जनता नाकारेल”; अखेर मणिपूरबाबत मोदींनी केले भाष्य
shambhuraj desai 10 percent maratha reservation
राज्यातील १० टक्के मराठा आरक्षण टीकवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार? शंभूराज देसाईंचं थेट उत्तर; म्हणाले…
Mast Group, trast Group,
संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर टीका, पुण्यात मस्त ग्रुप – त्रस्त ग्रुपच्या बॅनरची चर्चा
Supriya Sule
“लोकसत्ताक देशात पोलिसराज प्रस्थापित करण्यासाठी…”, नव्या फौजदारी गुन्ह्यांवरून सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “संसदेत…”
In kolhapur challenge for Congress mla satej patil to retain assembly seats in 2024 elections
कोल्हापुरातील गड शाबूत राखण्याचे सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान
Kolhapur protest against toll marathi news
कोल्हापूर: टोल हद्दपार करणारच; विराट मोर्चाद्वारे आजऱ्यात टोलला सर्वपक्षीय विरोध
Vasantrao Naik farmer debt relief movement started in the state from July 1 Announcement by Raju Shetty
राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू; राजू शेट्टी यांची घोषणा

कानुगोलूच्या टीमने, राजस्थान निवडणुकीपूर्वी एक मूल्यांकन केले होते. त्यानुसार, जिंकण्याची शक्यता कमी किंवा अगदीच नाही अशा उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. कानुगोलू फर्मच्या आणखी एका सदस्याने सांगितले की, अंतर्गत सर्वेक्षण हे तेलंगणातील यशामागे मुख्य कारण आहे. यात पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाचा किंवा पक्षाचा हस्तक्षेप नव्हता. तसेच पक्षपाती अहवाल पक्षाच्या बाजूने देण्याचा दबावही नव्हता. जर ग्राउंड रिअॅलिटीने खडतर लढा सुचवला असेल तर आम्हाला हे स्पष्टपणे पक्षाला सांगण्याचे स्वातंत्र्य होते. यामुळे विधायक चर्चा घडवून आणण्यास मदत झाली”, असं ते म्हणाले. कानुगोलू फर्मने प्रशांत किशोरच्या I-PAC सह सुरुवात केली होती.