देशात उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व जागांसाठी मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत मतदारांना आवाहन केलंय. अमित शाह यांनी भ्रष्टाचार आणि लांगुलचालनापासून मुक्त सरकारच देवभूमी उत्तराखंडचा विकास, अभिमान आणि सन्मानाला पुढे घेऊन जाऊ शकते, असं म्हणत मतदानाचं आवाहन केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासोबत आज (१४ फेब्रुवारी) उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे, की लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी व्हा आणि मतदानाचा नवा विक्रम बनवा. लक्षात ठेवा – आधी मतदान, मग दुसरं काम!”

PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार

अमित शाह म्हणाले, “भ्रष्टाचार आणि लांगुलचालनापासून मुक्त सरकारच देवभूमी उत्तराखंडचा विकास, अभिमान आणि सन्मानाला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे मी उत्तराखंडच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मतदान करून राज्याच्या विकास आणि प्रगतीत सहभागी व्हावं. आधी मतदान, मग जलपान.”

गोवा, उत्तराखंडमध्ये मतदान; दुसरा टप्पा : उत्तर प्रदेशातही ५५ जागांसाठी निवडणूक

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (१४ फेब्रुवारी) गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी मतदान होणार आह़े या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत. या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती. मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजपा आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपाला १३ जागा मिळाल्या होत्या़ मात्र, भाजपाने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता.

हेही वाचा : Electoral Ink पाण्याच्या संपर्कात येताच रंगात बदल, साबण असो की हँडवॉश, ही शाई सहजासहजी निघत का नाही?

उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आहे. राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होते. काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या़ उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान होणार असून, ५८६ उमेदवार रिंगणात आहेत. सहारणपूर, बिजनौर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बरेली आणि शाहजहानपूर आदी जिल्ह्यांमध्ये हे मतदान होईल. गेल्या निवडणुकीत भाजपने ५५ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या.

६० हजार पोलीस तैनात : उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५००० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. तिथे ६० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच निमलष्करी दलाचे शेकडो जवान तैनात आहेत.

Story img Loader