महायुतीला राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वासाठी आपण बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी घेतली. त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली असून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? यावरही वक्तव्य केलं आहे.

नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं-राज ठाकरे

यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. “नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटलं” त्यामुळेच मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केले.

CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”

“देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहून गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिलंं आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेतं फेकण्यात आली. राम मंदिरासाठी चाललेले प्रदीर्घ आंदोलन विसरता येणार नाही. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसतं”, असे राज ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…

सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का?

मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे. मात्र कुठे प्रचारसभा घ्यायची कुठे नाही ते अजून ठरवलेलं नाही. मतदान आलं की मैदानं बुक केली जातात. त्यामुळे सभा होतातच आता त्याबाबत काय करायचं ते पाहू असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क करायचा, कुणाशी बोलायचं? याची यादी दोन दिवसात तयार होईल आणि ती यादी त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल. कुठलाही घोळ व्हायला नको म्हणून ही यादी तयार करण्यात येणार आहे असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Story img Loader