१६ वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई दहशतवादी हल्ल्याने हादरली होती. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) गटाच्या १० दहशतवाद्यांच्या एका गटाने मुंबई शहरात बोटीच्या सहाय्याने प्रवेश केला आणि संपूर्ण शहरभर भयंकर हल्ले घडवून आणले. चार दिवसांत १६६ लोक मारले गेले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यानी केवळ मुंबईच नाही, तर भारतासह संपूर्ण जग हादरले होते. या घटनेनंतर भारताच्या दहशतवादविरोधी उपायांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले. हा हल्ला इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून आजही लोकांच्या स्मरणात आहे. परंतु, अजूनही या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पापांना न्याय मिळू शकलेला नाही. हल्ल्यात सामील असलेल्या १० पैकी नऊ दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार मारले होते, तर अजमल कसाब याला जिवंत पकडले होते. परंतु, हा हल्ला केवळ या १० जणांचे काम नव्हते. या हल्ल्यामागे अनेक मास्टर माइंड होते. हे दहशतवादी अजूनही जिवंत आहेत. या हल्ल्यातील आरोपी आहेत कुठे? जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा