26/11 Mumbai terrorist attack मुंबई म्हणजे कधीही न थांबणारे शहर. कुणीही आलं तरी आपलंस करते ती म्हणजे मुंबई. परंतु मुंबईच्या इतिहासात अशा काही घटना आहेत, ज्यांनी मुंबईला रक्तबंबाळ केले. या घटनांचे घाव इतके खोल आहेत की, त्याचे व्रण आजही तितकेच स्पष्ट आहेत. मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती नेहमीच दहशतवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’ वर असते. २००८ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला ही त्यातील एक महत्त्वाची घटना. या हल्ल्याने सारे जगच सुन्न झाले होते. या दहशतवाही हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबईच्या रक्षणासाठी ज्या काही वीरांनी बलिदान दिले त्यात एक नाव आवर्जून येते ते म्हणजे तुकाराम ओंबळे! त्यांच्या कर्तृत्त्वाची गाथा सर्वश्रुत असली तरी आज या घटनेला १५ वर्षं झाली, त्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाच्या स्मृतीला पुन्हा एकदा दिलेला हा उजाळा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा