सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. एका जागेवर बसून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण आपले सर्व व्यवहार करू शकतो. या महिन्यात १ ऑक्टोबर रोजी भारतात ५ जी सेवा लाँन्च करण्यात आली. सध्यातरी भारतातील काही मोजक्या शहरांत ही सेवा सुरू आहे. काही दिवसानंतर ही सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. दरम्यान, भारतात ५ जी सेवा सुरू नुकतीच लॉन्च झालेली असताना आता ‘६ जी’ची चर्चा होत आहे. २०३० सालापर्यंत जगभरात ६ जी सेवा येईल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ज्या बॉलिवूडने दुर्लक्षित केले तिथल्याच चित्रपटांना मागे टाकणारा ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी आहे तरी कोण?

Loksatta vasturang Legal Analysis of Penalty
दंड आकारणीचे विधिनिहाय विश्लेषण
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Guru Pushya Yoga
दिवाळीपूर्वी तयार होत आहे गुरु पुष्य योग! दागिने, मालमत्ता, वाहन खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या….
Factors influencing dryland agricultural productivity
कडधान्ये/डाळी पिकविणाऱ्या शेतकऱ्याला “लाडका शेतकरी” म्हणा!
Loksatta explained How much and how is the use of digital payment increasing in India
विश्लेषण: ‘डिजिटल पेमेंट’चा वापर भारतात किती, कसा वाढतो आहे?
upi
यूपीआय ‘वॉलेट’च्या मर्यादेत वाढ
National mission on Edible Oils
विश्लेषण: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान किती परिणामकारक?
sebi tightens futures and options trading rules
वायदे व्यवहाराचे नियम कठोर

६जी म्हणजे काय?

६ जी म्हणजे ६ जनरेशन कम्यूनिकेशन होय. हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे. ४ जी, ५ जी च्या तुलनेत ६ जी सेवा हायर फ्रिक्वेन्सीवर काम करणारी आहे. ही सेवा प्रत्यक्षात आल्यानंतर क्लाऊड बेस नेटवर्किंगच्या माध्यमातून सर्व तंत्रज्ञानाधारित कामे जलदगतीने आणि मायक्रोसेकंदाच्या विलंबाने करता येतील. ५ जी च्या तुलनेत ६ जी सेवा १०० पटीने जलद असणार आहे. ६ जी सेवा लॉन्च झाल्यानंतर जगभरात काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. तसेच या ६ जीमुळे कामांमध्ये माणसांचा सहभाग, देखरेख कमी होऊ शकते. ६ जी सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी चीन, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया तसेच काही युरोपीयन देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: आपण रोज किती तास झोप घ्यायला हवी? कमी किंवा जास्त झोपेमुळे शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

६ जी सेवेचा काय फायदा?

६ जी सेवेमुळे अनेक क्षेत्रांत मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रोबोटिक्स, वेअरेबल टेक्नोलॉजी (तंत्रज्ञानाधारित उपकरणं ज्यांना आपण परिधान करू शकतो. उदा- स्मार्ट वॉच, स्मार्ट ग्लास) कॉम्यूटर्स, फोन तसेच अन्य काही उपकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. ६ जी सेवा प्रत्यक्षात आली तर आभासी आणि वास्तविक जगातील अंतर आणखी कमी होऊ शकते. ६ जी तंत्रज्ञानामुळे विश्लेषण, अभ्यास करणे सोपे होईल. ज्यामुळे तर्क, अंदाज यांच्या माध्यमातून अचुकतेच्या आणखी जवळ पोहोचता येऊ शकते.

हेही वाचा >>> विश्लेषण : क्षी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन पेटलं, चीनमधील ‘ब्रिज मॅन’ची जगभरात होतेय चर्चा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

६ जी सेवेमुळे जगावर काय परिणाम होणार?

भारत हा विकसनशील देश असल्यामुळे येथे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीला बराच वाव आहे. लॉजिस्टिक्स, शहरी आणि ग्रामीण भागातील नियोजन, शेती, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांना ६ जी सेवेचा फायदा होऊ शकतो. ६ जी सेवोचा हवामानाची स्थिती, वाहतूक नियंत्रणालाही फायदा होऊ शकतो. भारतीय शेतीला विशेषत: या सेवेचा चांगला फायदा होऊ शकतो. चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती यांना तोंड देण्यासाठी ६ जीच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी मदत होऊ शकते. ६ जीच्या मदतीने ४डी फोटोज मिळवणे आणखी सोपे होऊ शकते. ज्याचा उपयोग महानगरांतील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्यासाठी करता येऊ शकतो. आरोग्य क्षेत्रातील सुविधादेखील अत्याधुनिक करता येऊ शकतील.