देशातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव वाढत चालला आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशातील ८६ टक्के कर्मचारी स्वत:ला पीडित आणि संघर्ष करणारे समजतात. केवळ १४ टक्के कर्मचारी समाधानी आणि समृद्ध आहेत. हा आकडा जागतिक सरासरीच्या ३४ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. अमेरिकन ॲनालिटिक्स कंपनी गॅलपच्या ग्लोबल वर्कप्लेस रिपोर्टनुसार, भारतातील कर्मचारी खूश नाहीत. गॅलपच्या जगभरातील कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यावर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या लोकांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली गेली आहे. यात समृद्ध, संघर्षशील आणि दुःखी अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, केवळ १४ टक्के भारतीय कर्मचारी स्वत:ला समृद्ध समजतात. मिळालेल्या माहितीनुसार, ८६ टक्के कर्मचारी स्वत:ला त्रासलेले समजतात. त्यांनी स्वत:ला संघर्ष आणि दुःखी या श्रेणीत ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा