Marathi Sahitya Sammelan 2025: २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणारे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संमेलनाच्या तयारीचा अलीकडेच आढावा घेतला. यावेळी संमेलनाचे संयोजक आणि सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नाहर, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि त्यांची टीम उपस्थित होती.nआयोजन स्थळावरील सर्व प्रवेशद्वारं महापुरुषांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे नाव देण्यात आले आहे. तसेच, बाजीराव पेशवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्याही नावांचा समावेश करण्यात आलेला आहे. आयोजनस्थळी सुमारे ४,००० जणांची आसनव्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय नाहर यांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे देशाच्या राजधानीत होणार असल्याने ही आनंदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तालकटोरा या स्थळाचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी असलेला संबंध सर्वश्रुत आहे. याच ऐतिहासिक संबंधाचा घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा