जवळपास सहा महिन्यांआधी एका धार्मिक कट्टरतावादी युवकांने प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले होते. त्यानंतर आता रश्दी आपल्या नव्या कांदबरीसह पुन्हा वाचकांसमोर येत आहेत. व्हिक्टरी सिटी (Victory City) या कांदबरीमध्ये रश्दी यांनी विजयनगर राज्याची काल्पनिक कथा चितारली आहे. त्यांच्या कांदबरीमधील एक पात्र, जादूगार आणि कवी असलेला पम्पा कंपना हा विजयनगरच्या जय-पराजयाचा दोन शतकापेंक्षा अधिकच्या काळाचा साक्षीदार आहे. विजयनगर राज्य हे फार पूर्वीपासूनच ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या सर्वांच्या कुतुहलाचा विषय राहिलेले आहे. विजयनगरची राजधानी असलेले हंपी शहर तुंगभद्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे. याच ठिकाणाहून विजयनगरने जवळपास ३ लाख ६० हजार चौरस किमीपेक्षा अधिकच्या प्रदेशावर राज्य केले. १३३६ साली स्थापन झालेले विजयनगरचे राज्य तीन शतकांहून अधिक काळ टिकले. परकीय आक्रमण झेलून देखील कला आणि अर्थव्यवस्थेत विजयनगरने उल्लेखनीय प्रगती केली होती. रश्दी यांच्या कांदबरीच्या निमित्ताने विजयनगर साम्राज्याचा घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा