सुशांत मोरे
मेट्रो रेल्वे, वातानुकूलित बेस्ट बस, ॲप आधारित वातानुकूलित टॅक्सी यातून सुखद आणि झटपट प्रवासाच्या पर्यायांबरोबरत मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरूप बदलत आहे. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित अर्थात एसी लोकल सेवेत आणल्या. मात्र, विनावातानुकूलित लोकलच्या तिकिट दराच्या तुलनेत वातानुकूलित गाड्यांचे तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठच फिरवली. त्यामुळे तिकीट दरात ५० टक्के कपात करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू झाला. मात्र पास दरात कपात न करणे, सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल चालविणे इत्यादी कारणांमुळे प्रवाशांची नाराजीही ओढवून घेतली आहे. त्यातच ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल, असे सातत्याने मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत होते. ही वाढ सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलची करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील लोकलप्रवासी खवळले आहेत. त्यातूनच कळवा स्थानकात एसी लोकल रोखून धरण्याचा प्रकार घडला. एसी लोकल अजून प्रवाशांच्या पचनी का पडत नाही, याविषयीचा आढावा –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा