काल २५ जून रोजी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. एकीकडे विरोधकांनी राज्यघटनेच्या संरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला असताना दुसऱ्या बाजूला भाजपाने आणीबाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले आहे. काल आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला ४९ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली आहे. राजीव गांधी यांनी इंदिरा गांधींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आणीबाणीच्या निर्णयाचे समर्थन केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ‘चारसौपार’ जागा प्राप्त झाल्या तर हा पक्ष देशाची राज्यघटना बदलेल, असा प्रचार काँग्रेससहित सर्वच विरोधकांनी केल्याचे दिसून आले. या प्रचाराचा फायदाही विरोधकांना झाल्याचे दिसून आले. अगदी नव्या लोकसभेतील सदस्यांच्या शपथविधीलाही विरोधकांनी राज्यघटनेची प्रत हातात घेऊन एकप्रकारे प्रतिकात्मक संदेश दिला. विरोधकांच्या या राजकीय डावपेचाला शह देण्यासाठी आता भाजपा आणीबाणीच्या मुद्द्याचा वापर करताना दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा