महाराष्ट्रात येवला येथे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या उभ्या शेतात मेंढ्या सोडून दिल्या; तर नाशिकच्या एका शेतकऱ्याने होळीच्या निमित्ताने आपल्या कांद्याच्या उभ्या पिकाची होळी पेटवली. या आणि अशा स्वरूपाच्या अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेत तो कवडीमोल ठरला आहे. गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा शेतकऱ्यालाही सद्ध्या रडवतो आहे. यामुळेच दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात मोर्चा काढला होता. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवडीमोल ठरलेला कांदा राज्य सरकार उत्पादक शेतकऱ्यांकडून ३०० रुपये क्विंटल या भावाने खरेदी करेल, अशी घोषणा अलीकडेच केली. कांदा उत्पादक देशांच्या यादीत भारत हा अग्रेसर आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे राज्य आहे. असे असताना त्याच कांद्याला एपीएमसीसारख्या बाजारपेठेत किलोला एक रुपया दर मिळाला आणि कांद्याच्या अर्थकारण कोलमडले. याच पार्श्वभूमीवर कांद्याच्या आजवरचा रंजक इतिहास जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा