इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे २० व्या ‘आसियान – भारत’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि १० राष्ट्रांच्या ‘आसियान’ गटादरम्यान दूरसंचार, व्यापार व डिजिटल परिवर्तन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी १२ कलमी प्रस्ताव गुरुवारी (७ सप्टेंबर) सादर केला. “आसियान (Association of Southeast Asian Nations – ASEAN) हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ असून, भारत-प्रशांत क्षेत्राच्या (इंडो-पॅसिफिक) दृष्टिकोनातून भारत या गटाच्या केंद्रस्थानाला पूर्ण समर्थन देतो”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. करोनानंतरची जागतिक व्यवस्था नियमावर आधारित निर्माण करण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुक्त व खुल्या भारत-प्रशांत क्षेत्राच्या दिशेने प्रगती आणि जागतिक दक्षिणेचा (ग्लोबल साऊथ) आवाज उन्नत करणे हे सर्वांचे सामायिक हित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा