इंग्रज येण्यापूर्वी लाहोरमध्ये गणिकांचे मंत्रमुग्ध करणारे जग होते असे चित्रण संजय लीला भन्साली यांनी त्यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सिरीजमध्ये केलं आहे. परंतु त्यांनी हीरामंडीचे जे काही चित्रण केले आहे, त्यात कल्पनाविस्तारच अधिक असल्याचे मत इतिहासकार याकूब खान बंगश यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. ते म्हणतात ही सिरीज पाहताना असे काही क्षण आहेत जेंव्हा मला वाटले काहीतरी खरे दाखवायला हवे होते. तवायफ ज्या महालात राहतात तो महाल शेजारच्या किल्ल्यातील किंग चेंबर्सपेक्षा मोठा आहे, उर्दू शब्दलेखन लखनऊ आणि अलाहाबादच्या वंशजांना लाजवेल इतके चपखल आहे आणि लाहोरमधील मुस्लिम नवाबांची संख्या पाहून इतके नवाब होते कुठे हे शोधण्याची इच्छा होते. नशीब असे की, लाहोरमधील स्थळांची नाव तरी खरी आहेत. ‘हीरामंडी,’ किंवा ‘हिरा मंडी’ असं गुगलवर सर्च केलं तर त्याचा या सिरीजमध्ये दाखवलेल्या स्त्रियांच्या सौंदर्याशी काहीही संबंध नसल्याचे उघड होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा