बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका कवितेवर सध्या प्रचंड टीका होत आहे. ‘जंगलात ठरली मैफल’ असे या कवितेचे नाव असून, या कवितेमध्ये काही इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्यामुळे अनेक जण टीका करीत आहेत. ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’, या फेसबुक ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी या कवितेचे छायाचित्र पोस्ट करीत म्हटले आहे, “हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक! कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे ‘वन्स मोर वन्स मोर झाला शोर…’ किमान मराठी भाषा शिकवताना तरी मराठी शब्द वापरायला हवेत, असे वाटत नाही का? तुमचे मत काय?” त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर या कवितेचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एकूणच बालभारतीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम, त्यामध्ये निवडले जाणारे साहित्य आणि निवडसमिती आणि त्यातील हितसंबंध या अनुषंगाने लोक टीका करताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा