केरळमधील बहुतेक मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या दोन प्रमुख देवस्वोम मंडळांनी गुरुवारी मंदिरांना प्रसादासाठी ऑलिंडरच्या फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वोम बोर्डाने या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राण्यांना इजा होऊ शकते, असे मंडळाने म्हटले आहे. TDB चे अध्यक्ष पीएस प्रशांत यांनी गुरुवारी बोर्डाच्या बैठकीनंतर त्यांच्या अखत्यारीतील मंदिरांबाबत निर्णय जाहीर केला. प्रशांत यांनी पत्रकारांना सांगितले की, “TDB अंतर्गत नैवेद्य (देवाला अर्पण केलेल्या वस्तू) आणि मंदिरांमध्ये प्रसादात ऑलिंडरच्या फुलांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी तुळशी, थेची (इक्सोरा), चमेली आणि गुलाब यांसारखी इतर फुले वापरली जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलबार देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष एम आर मुरली यांनी सांगितले की, त्यांच्या अधिकारक्षेत्रातील १४०० हून अधिक मंदिरांमध्ये विधींसाठी ऑलिंडरच्या फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुरली यांनी पीटीआयला सांगितले की, “मंदिरांमध्ये ऑलिंडरच्या फुलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत नसला तरी भाविकांच्या सुरक्षेसाठी त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या फुलामध्ये विषारी पदार्थ असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले. अलाप्पुझा आणि पठाणमथिट्टा येथे झालेल्या अनेक घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अलाप्पुझा येथील एका महिलेचा नुकताच ऑलिंडरची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी पाथनमथिट्टा येथे ऑलिंडरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासराचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

नेमके काय झाले?

सूर्या सुरेंद्रन या २४ वर्षीय नर्सचा ३० एप्रिल रोजी अपघाती ऑलिंडर फुलांमुळे विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. सुरेंद्रन हिला यूकेमध्ये नवीन नोकरी मिळाली होती आणि २८ एप्रिल रोजी ती निघणार होती. मात्र, त्या दिवशी सकाळी तिने अलाप्पुझा येथील पल्लीपॅड येथे तिच्या घराबाहेर उगवलेल्या ऑलिंडर वनस्पतीची काही पाने चघळली. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळा उलट्या झाल्या. त्या दिवसानंतर ती कोची विमानतळावर कोसळली आणि काही दिवसांनी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिने काय खाल्ले आहे असे विचारले असता ऑलिंडरची पाने आणि फुले चघळण्यासंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली. फॉरेन्सिक सर्जन ज्यांनी तिचे शवविच्छेदन केले, त्यांनी पोलिसांना ऑलिंडरमधून विषबाधा झाल्याची माहिती दिली.

हेही वाचाः इस्रोने रचला नवा विक्रम! 3D-प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी; हे प्रिंटर नक्की कसे काम करते?

ऑलिंडर म्हणजे काय?

नेरियम ऑलिंडर ज्याला सामान्यतः ओलेंडर किंवा रोझबे म्हणून ओळखले जाते, ही एक वनस्पती आहे, जी जगभरात उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशात आढळली जाते. खरं तर हे झाड बहुतेक वेळा शोभेच्या आणि लँडस्केपिंगसाठी वापरले जाते. केरळमध्ये ऑलिंडर वनस्पती अरली आणि कनावीरम या नावांनी ओळखली जाते. तसेच नैसर्गिकरीत्या महामार्ग आणि समुद्रकिनाऱ्यावर ती उगवली जाते. ऑलिंडरच्या वेगवेगळ्या जाती आहेत, प्रत्येकाला वेगळ्या रंगाचे फूल आहे.

पारंपरिक औषधांमध्ये ऑलिंडरचा वापर कसा केला जातो?

आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया (API)नेसुद्धा आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता, शुद्धता आणि सामर्थ्य यांचे वर्णन करताना ऑलिंडरचा उल्लेख केला आहे. एपीआयनुसार, मुळांच्या सालापासून तयार केलेले तेल त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. इतर शास्त्रीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये या वनस्पतीचे वारंवार वर्णन केले गेले आहे. चरक संहितेमध्येही ऑलिंडर वनस्पतीच्या पांढऱ्या जातीची पाने बाह्यतः कुष्ठरोगासह गंभीर स्वरूपाच्या उपचारात वापरली जातात. हिमालयी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल डेहराडूनच्या अनामिका चौधरी आणि भावना सिंग यांनी त्यांच्या शोधनिबंधात लिहिले आहे की, इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेद अँड मेडिकल सायन्सेसमध्ये २०१६ मध्ये प्रकाशित करवीरा(ऑलिंडर)चे गंभीर पुनरावलोकन करण्यात आले आहे. भावप्रकाशाने करवीरा(ऑलिंडर) वनस्पतीचे दुसरे नाव विशा (विष) असे वर्णन केले आहे. तसेच ही वनस्पती संक्रमित जखमा, कुष्ठरोगासह त्वचेचे रोग, सूक्ष्मजंतू आणि परजीवी, खाज सुटणे यांच्या उपचारासाठी वापरली जाते.

ऑलिंडर किती विषारी आहे?

आयुर्वेदानुसार ऑलिंडर विषाक्ततेसाठीसुद्धा जगभरात ओळखली गेली आहे. संशोधक शॅनन डी लँगफोर्ड आणि पॉल जे बूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनस्पती पुरातन काळापासून उपचारात्मक आणि आत्महत्येचे साधन म्हणून वापरली गेली आहे. ऑलिंडर जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुराच्या सेवनानंही मादक नशा चढू शकतो. हे कार्डियाक ग्लायकोसाइड्सच्या गुणधर्मांमुळे आहे, ज्यात ओलेंड्रीन, फॉलिनिन आणि डिजिटॉक्सिजेनिन यांचा समावेश आहे, जे वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये असतात.

उपचारात्मक दृष्ट्‍या या वनस्पतीचा कमी प्रमाणात वापर करावा लागतो. जास्त प्रमाणात वापर केल्यास ते प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. ऑलिंडरच्या विषारीपणाच्या परिणामांमध्ये मळमळ, अतिसार, उलट्या, पुरळ, चक्कर येणे, हृदयाचे अनियमित ठोके, मंद हृदयाचे ठोके अशी लक्षणे पाहायला मिळतात. न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, “लक्षणे १ ते ३ दिवस पाहायला मिळतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु मृत्यूचे प्रमाण कमी आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on oleander flowers in temple offerings in kerala state what exactly is the reason vrd