बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी देश सोडला असल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशमध्ये जुलै महिन्याची सुरुवातच हिंसक आंदोलनाने झाली असून, अद्यापही देशातील हिंसाचार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. जुलैच्या अखेरीस थोडा काळ शांतता निर्माण झालेली असताना काल रविवारी (४ ऑगस्ट) पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, संपूर्ण देशभरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल रविवारी सरकारविरोधात उफाळलेल्या हिंसक आंदोलनामध्ये जवळपास १०० जणांनी आपला जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी या परिस्थितीबाबत शोक व्यक्त करताना म्हटले आहे, “मी बांगलादेशमधील राजकीय नेतृत्व आणि सुरक्षा दलांना आवाहन करतो की, त्यांनी जगण्याचा अधिकार, शांततेने जमण्याचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या कर्तव्यांचे पालन करावे.” पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. मात्र, बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनाची लाट का पसरली? आणि पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा का द्यावा लागला, याबाबत माहिती घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा