पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका आणि इजिप्तचा सहा दिवसांचा दौरा करून भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर परतल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या या परदेश दौऱ्याचे अनेकांनी आपापल्यापरिने विश्लेषण केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात जागतिक योगा दिवस साजरा करणे, अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक विषयांवर द्विपक्षीय करार करणे, तसेच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद या सारख्या अनेक कृतीतून हा दौरा यशस्वी झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी इजिप्तहून भारताकडे निघालेले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या एका विधानाने सर्वांचे लक्ष खेचून घेतले आहे. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्याबाबत जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याला तर त्यांनी उत्तर दिलेच. शिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतीय मुस्लीमांबाबतच्या वक्तव्याचाही सीतारमन यांनी समाचार घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा